अंमलबजावणी संचालनालयाकडून ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’ची १८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथित मानवाधिकार संघटना भारतविरोधी कारवाया करते. त्यामुळे या संघटनेची शाखा असलेल्या ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’ची केवळ संपत्ती जप्त न करता त्याच्यावर बंदी घालणे आवश्यक !

रायपूर (छत्तीसगड) येथील संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

सनातन संस्था, सनातन प्रभात, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य म्हणजे भारताच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. या कार्याला आश्रय देणे, सहकार्य करणे, त्यात सहभाग घेणे, हे प्रत्येकाने करायला हवे.

केंद्र सरकारकडून जनतेसाठी संदेश या अ‍ॅपची निर्मिती व्हॉट्सअ‍ॅपला भारतीय पर्याय

व्हॉट्सअ‍ॅपकडून गोपनीयतेविषयी नवीन धोरण लागू केल्याने अनेकांनी त्याचा विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने संदेश हे व्हॉट्सअ‍ॅप सारखे काम करणारे नवीन अ‍ॅप जनतेसाठी आणले आहे.

पेट्रोल आणि डिझेल वाढीवर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे मौन का ? – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग शासनाच्या काळात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्वीटरच्या माध्यमातून डिझेल-पेट्रोल तेलांच्या वाढत्या किमतींवर बोलत होते; मात्र आता त्यांनी यावर मौन बाळगले आहे.

हिंदु महिलांविषयी अश्‍लाघ्य टिपणी असलेल्या कादंबरीला केरळ साहित्य अकादमीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीचा पुरस्कार !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. साम्यवादी आघाडी सरकार सत्तेत असलेल्या केरळमधील साहित्य अकादमीकडून याहून वेगळी अपेक्षा तरी काय करणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होणे आवश्यक आहे.

ओटीटी अ‍ॅप्सवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार विचार करत आहे !

ओटीटी अ‍ॅप्सवरील वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान करण्यात येत असून हा प्रकार गेले अनेक मास चालू आहे. अनेक संघटना याचा विरोध करत असतांना सरकार अजून विचारच करत आहे, हे राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !

पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात भरती  

मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना येथील म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

३१ वर्षांनंतर उघडण्यात आले श्रीनगरमधील शीतलनाथ मंदिर !

जिहादी आतंकवादामुळे गेली ३१ वर्षे बंद असलेले येथील हब्बा कदल भागातील शीतलनाथ मंदिर वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांसाठी उघडण्यात आले.

देहली हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य आरोपी मनिंदर सिंह याला अटक : २ तलवारी जप्त

गुन्ह्यांच्या प्रकरणी आरोपींना अटक झाल्यावर त्याचे खटले वर्षानुवर्षे चालत रहातात. या काळात आरोपी जामीनावरही सुटतो; मात्र त्याला शिक्षा होण्याची शक्यता अल्प रहाते. या घटनेतही तसेच होऊ नये !

मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपी निकिता जेकब हिला अंतरिम जामीन संमत

देहली येथील शेतकरी आंदोलनाचे ‘टूलकिट’ शेअर केल्याच्या प्रकरणातील आरोपी निकिता जेकब हिला मुंबई उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन संमत केला आहे.