
भंडारा – तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग शासनाच्या काळात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्वीटरच्या माध्यमातून डिझेल-पेट्रोल तेलांच्या वाढत्या किमतींवर बोलत होते; मात्र आता त्यांनी यावर मौन बाळगले आहे. आता या गोष्टींचा विसर पडल्याने भविष्यात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तसेच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे १८ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
देशातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने १८ फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलन चालू केले आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलन करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोलचा दर ७० रुपये लिटर झाला होता, तेव्हा त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाष्य करून मनमोहन सिंग शासनावर टीका केली होती; मात्र आता हा दर १०० रुपये प्रती लिटर झाल्यानंतरही ते गप्प आहेत ? त्यांच्यात मोदी सरकारच्या विरोधात बोलण्याचे धैर्य नाही का ? इंधन दरवाढीनंतरही भाजप नेते शांत कसे ?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !