अभिनेत्री दीया मिर्झा यांनी स्वतःच्या विवाहामध्ये कन्यादान परंपरा वगळली !

कन्यादान करणार्‍या व्यक्तीच्या मागील १२ पिढ्या, पुढच्या १२ पिढी आणि स्वतःची १ पिढी यांचा उद्धार होतो, असे धर्मशास्त्र सांगते. मात्र फुकाचा पुरोगामीपणा मिरवण्यासाठी अशी टूम सध्या निघाली आहे. हिंदूंनी यापासून सावध रहावे !

राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी मुसलमानांनी उपस्थित रहाण्यासाठी इमामाकडून फतवा !

काँग्रेससाठी अशा प्रकारचे किती फतवे काढण्यात आले, तरी आता काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे !

माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्याविरुद्धच्या लैंगिक छळाच्या आरोपाच्या अन्वेषणाची कार्यवाही बंद

गोगोई यांनी आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सिद्धता करण्यासह काही सूत्रांवर कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही कट शिजला असावा, या गुप्तवार्ता विभागाच्या संचालकांच्या पत्राचा न्यायालयाने या वेळी उल्लेख केला.

जगभरात दहशत आणि हिंसा पसरवण्यात उच्चशिक्षितांचा सक्रीय सहभाग ! – पंतप्रधान मोदी

जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे आणि हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित अन् व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्‍व भारती विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभामध्ये म्हटले.

झारखंडमध्ये गेल्या ११ मासांमध्ये १ सहस्र ६५७ बलात्कार

अशा बलात्कार्‍यांना तात्काळ फासावर चढवायला हवे, तरच या प्रकारच्या गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा बसेल. तसेच जनतेला धर्मशिक्षण देऊन सुशिक्षित करणे आणि महिलांना स्वरक्षणाचे धडे देणे, हीच काळाची आवश्यकता आहे !

‘अ‍ॅपल’चा ‘आयपॅड’ आता भारतात निर्मित होण्याची शक्यता !

भारत सरकारकडून स्मार्टफोन्स निर्यातीला अधिक चालना मिळावी, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या अंतर्गत सुमारे ५० सहस्र कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येईल, असे घोषित करण्यात आल्याने ‘अ‍ॅपल’ या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे.

सीओपीडी मुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक !

घरोघरी होणार्‍या वायू प्रदूषणामुळे क्रॉनिक ओबस्ट्रक्टिव पल्मनरी डिसीज हा आजार होण्याची दाट शक्यता !

वर्ष २०२१ च्या आय.पी.एल्. स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व पुन्हा चीनच्या विवो आस्थापनाला !

यातून बीसीसीआयची ढोंगी देशभक्ती दिसून येते ! बीसीसीआयला देशभक्तीपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा वाटत असल्याने त्याने पुन्हा चीनच्या आस्थापनाला प्रायोजकत्व दिले, अन्यथा त्याने भारतीय किंवा अन्य एखाद्या विदेशी आस्थापनाला ते दिले असते !

मासेमार महिलेने तमिळ भाषेत राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली असतांना भाषांतर करतांना तिने कौतुक केल्याचे सांगितले !

काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांचा खोटेपणा ! जे काँग्रेसी शासनकर्ते स्वतःच्या वरिष्ठ नेत्याची फसवणूक करतात, ते जनतेशी कसे वागत असतील ?

पत्रकार दिलीप मंडल यांच्याकडून श्री सरस्वतीदेवीविषयी अश्‍लील ट्वीट

भारतात अशा कृत्यांसाठी कठोर कायदा नसल्याने धर्मद्रोह्यांचे फावते ! केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंच्या देवतांचा विविध माध्यमांतून होणारा अवमान रोखण्यासाठी पाकमध्ये असलेल्या ईशनिंदा विरोधी कायद्याप्रमाणे कायदे करणे आवश्यक !