आसुरी वृत्तीचा कोण ?

हिंदु धर्माचे मर्म लक्षात घेऊन आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करूनच चित्रपट काढावा, अन्यथा हिंदू शांत बसणार नाहीत. धार्मिक इतिहासात फेरफार करणारे हेच हिंदूंच्या दृष्टीने दुष्प्रवृत्तीचे आहेत. अशांना वैध मार्गाने वठणीवर कसे आणायचे, याचे तंत्र हिंदूंना अवगत आहे, हेही संबंधितांनी जाणावे !

अ‍ॅलेक्झांडर, मोगल, ब्रिटीश, सोनिया काँग्रेस हे त्यांच्या सामर्थ्यामुळे नाही, तर हिंदू संघटित नसल्याने यशस्वी झाले ! – भाजपचे सरचिटणीस सी.टी. रवि

आक्रमक शक्तींपासून आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्रित होण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ०६.१२.२०२०

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून प्राणघातक आक्रमण

बजरंग दलाचे श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी  शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. आक्रमणामागील कारण समजू शकलेले नाही. श्री. नागेश हे गोरक्षण, धर्मांतर रोखणे आदी धर्मकार्यात आघाडीवर असतात.

हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण कधी होणार ?

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. यात गंभीररित्या घायाळ झालेल्या श्री. नागेश यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शरणार्थी आणि भारताचे दायित्व

बाहेरून देशात येणारा कोणताही हिंदु हा घुसखोर नसून तो शरणार्थी आहे आणि त्याला सन्मानाचे जीवन अन् अधिकार मिळायलाच हवेत, हे लक्षात ठेवून भारताने शरणार्थींच्या संदर्भात आपले नैतिक दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा !

राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात गाजलेल्या पुणे शहराला हे लज्जास्पद !

पुणे महानगरपालिका पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे. आता तर धर्मद्रोहाची परिसीमा गाठत विसर्जनासाठी दान म्हणून घेतलेल्या श्री गणेशमूर्तींची पुनर्विक्री करत असल्याचे उघड झाले आहे !

मध्यप्रदेशात हिंदु नाव सांगून धर्मांधांने हिंदु तरुणीशी विवाह केल्यानंतर धर्मांतरासाठी तिच्यावर दबाव

पीडित महिलेने तिला सलमान नावाच्या तरुणाने उमेश असे हिदु नाव सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह केला आणि नंतर धर्मांतरासाठी त्रास देत असल्याची तक्रार केली. त्यानंतर मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील आश्रमातील २ साधूंचा संशयास्पदरित्या मृत्यू, तर तिसर्‍याची प्रकृती चिंताजनक

भाजपचे राज्य असणार्‍या उत्तरप्रदेशमध्ये सातत्याने साधू, संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

हिंदुत्वाचा र्‍हास होत असतांना निद्रिस्त असलेले केरळमधील हिंदू !

काश्मिरी पंडितांविषयी काय झाले, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. हिंदूंना इतिहासापासून शिकायची इच्छा नाही. जोपर्यंत संकट दारापर्यंत येत नाही, तोपर्यंत ते विश्‍वास ठेवत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळमधील हिंदू !