ज्या ठिकाणी धर्मांध बहुसंख्य होतात, तेथे ते कायदा आणि नियम धाब्यावर बसवतात, याचे हे उदाहरण आहे. हिंदूंना नेहमी आरोपीच्या पिंजर्यात उभे करणारी पुरोगामी मंडळी अशा विषयांत मात्र गप्प रहातात. सहिष्णु हिंदूंना आक्रमक ठरवायचे आणि आक्रमक धर्मांधांना अल्पसंख्यांक म्हणून गोंजारायचे, यालाच धर्मनिरपेक्षता म्हणायचे का ?

मुंबई – नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील रहमतनगर येथे अवैधरित्या हातगाड्या लावणार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकार्याला धर्मांध फेरीवाल्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा नोंदवला असून ३ जणांना अटक केली आहे.
मारहाण झालेल्या अधिकार्याचे नाव मधुकर डोंगरे असे आहे. रहमतनगर येथे अवैध हातगाड्या आणि दुकाने असलेल्यांकडून येथे वाहतुकीला अडथळा होत आहे. खरेदी करण्यासाठी येणार्या सर्वसामान्य नागरिकांशीही हे फेरीवाले वाद घालतात. याविषयी तक्रारी महानगरपालिकेकडे करण्यात आल्या होत्या. २६ एप्रिल या दिवशी अवैध धंदे करणार्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता तेथील धर्मांध फेरीवाल्यांनी डोंगरे यांच्यावर आक्रमण केले. या वेळी धर्मांधांच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून डोंगरे यांनी तेथून पलायन केले.
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांसाठी भागवत ग्रंथ आधार वाटतो ! – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !