ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, प्रज्ञा भारती, तेलंगाणा

श्री. गिरिधर ममिडी

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या राजवटीत ‘एंडोव्हमेंट’ कायदा लागू करून मद्रास प्रांतातील मंदिरांवर एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यात आली. या अन्वये मंदिरांच्या १ लाख एकर भूमीचे अधिग्रहण केले गेले. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आलेल्या कोणत्याही सरकारने यात पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच आज श्री शैलम् अथवा तिरुमला तिरुपति देवस्थानची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आज हिंदु नावे असलेले परंतु इतर धर्मीय प्रशासक या मंदिरांचा कारभार सांभाळण्यासह संपत्ती लुटत आहेत. हिंदूंचा आवाज दाबून आणि त्यांची शक्ती न्यून करून त्यांच्यावर शासन केले जात आहे. जर आपल्या मंदिरांना वाचवायचे असेल, तर ‘एंडोव्हमेंट’ कायदा रहित करणे, हाच एकमेव पर्याय आहे. ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या !