पोलीस विभागातील परिवर्तन आणि ईश्वरी अधिष्ठानाची आवश्यकता !
वरपासून खालपर्यंत सर्व व्यवस्था किडलेली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यामुळे या भ्रष्ट व्यवस्थेला कुणाचेच भय राहिलेले नाही. सर्व व्यवस्था पालटायची असेल, तर पोलीस विभागापासूनच प्रारंभ करावा लागेल. भ्रष्ट पोलीस कर्मचार्यांना खड्यासारखे बाजूला काढून उर्वरित चांगल्या कर्मचार्यांना घडवावे लागेल. त्यासाठी आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.