तहसीलदारांनी ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार

दळणवळण बंदीच्या काळात येथील खानापूर तालुक्यात मार्च २०२० ते मे २०२० पर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही या काळात पेंडल व्यवस्था, पोलीस बॅरिकेट्स, जेवण, ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ आणि इतर कामे यांसाठी ७५ लाख रुपये व्यय दाखवण्यात आला आहे.

भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात भाजपचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना घेराव

आज शासकीय कर्मचार्‍यांना सहस्रो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत वेतन मिळते. असे असतांना वैद्यकीय दाखले आणि शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील, तर ते सर्वथा लज्जास्पद आहे !

महामार्ग सुविधाजनक हवेत !

गत ५० वर्षांपासून सातारावासियांचे ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४’शी जिव्हाळ्याचे नाते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या रस्त्याचे विशेष महत्त्व सातारकर अनुभवत आहेत.

घोटाळ्याचा आरोप असणार्‍या बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे त्यागपत्र

शिक्षणमंत्रीपद जनता दल (संयुक्त)चे डॉ. मेवालाल चौधरी यांना देण्यात आले होते; मात्र त्यांच्यावर साहाय्यक प्राध्यापक नियुक्तीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप असल्यामुळे टीका होऊ लागली. त्यामुळे डॉ. चौधरी यांनी दोनच दिवसांत त्यांच्या मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे.

आरोपी राजीव सक्सेना याने घेतले काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि सलमान खुर्शिद यांचे नाव !

ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील आरोपी राजीव सक्सेना यांनी चौकशीमध्ये काँग्रेसच्या नावांचा उल्लेख केला आहे.

शिक्षण समित्यांची ‘अनास्था’ !

पद आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी शिक्षण समित्या किंवा मंडळे स्थापन करायची, त्यामध्ये निवडून न आलेल्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना स्थान मिळवून द्यायचे, इतकेच काय ते या शिक्षण समित्या अथवा मंडळांचे सध्याचे स्वरूप झाले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बिलीव्हर्स ईस्टर्न चर्च आणि के.पी. योहानन यांची सर्व संपत्ती जप्त करा !

राष्ट्रीय बजरंग दलाद्वारे बिलीव्हर्स ईस्टर्न चर्चच्या तिरुवल्ला मुख्यालयाजवळ निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी के.पी. योहानन यांना अटक करून त्यांची आणि या चर्चची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याची मागणी करण्यात आली.

येरवडा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लवकर क्रमांक लावण्यासह अस्थी परत देण्यासाठी पैशांची मागणी

समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना ! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या असंवेदनशील कर्मचार्‍यांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी !

पुणे जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी केवळ दंडात्मक कारवाई

दळणवळण बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार पूर्णपणे बंद असतांनाही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध उत्खनन आणि वाहतूक चालू आहे. यावर कारवाई करत जिल्हा प्रशासनाकडून दोन मासांत १७ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे.