चेन्नई येथे मंदिरासाठीची आरक्षित भूमी महापालिकेने सभागृह बांधण्यासाठी कह्यात घेतल्याच्या विरोधात भारत हिंदू मुन्नानीचे आंदोलन

हिंदूंना भारतात कुणीच वाली नसल्याने अशा घटना सरकारी यंत्रणांकडून होत आहेत. ही स्थिती रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे सरकारीकरण झाल्यानंतर वाढलेले अपप्रकार आणि गैरव्यवहार !

पंढरपूरचे देवस्थान सरकारच्या कह्यात गेले. आय.ए.एस्. असलेल्या कार्यकारी अधिकार्‍याने मंदिरातील संतांची समाधी कट्टा समजून पाडली, पंढरीच्या प्रसादात पालट केला. एका अधिकाऱ्याने देवीला आलेल्या वस्तू पळवल्या. असे गैरप्रकार होत आहेत.

संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले ? याचे अन्वेषण व्हायला हवे ! – किरीट सोमय्या, भाजप

अंमलबजावणी संचालनालयाने सौ. वर्षा राऊत यांना बँके’तील आर्थिक अपहाराप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी हे वक्तव्य केले आहे.

सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

मंदिरे शासनाच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधाचे अवैध घर पालिकेकडून उद्ध्वस्त !

हे घर बांधेपर्यंत पोलीस आणि नगरपालिका यांचे अधिकारी झोपले होते का ? जर या घरावरून दगडफेक झाली नसती, तर पोलीस आणि नगरपालिका यांनी अशी कारवाई केली नसती ! अवैध घरांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका करण्याचा विचार करणार आहे ! – अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघेही केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा उपयोग करत आहेत. अन्वेषण यंत्रणांचा चुकीचा वापर होत असेल, तर अंमलबजावणी संचालयालय आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करायला हवी.

अयोग्य पद्धतीने वापर होत असलेल्या देवस्थानांच्या भूमी कह्यात न घेतल्यास उपोषण करणार !

हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवस्थान आणि तुळजापूरचे श्री भवानीमातेचे देवस्थान यांच्या भूमीविक्रीच्या, दागिन्यांच्या आदी काही प्रकरणांवर आवाज उठवल्यावर त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी चालू झाली आहे.

मूलभूत सुविधांचा फार्स !

जे प्राथमिक आहे, तेच होत नाही, तर आंतरिक प्रेरणेने जनतेला काय आवश्यक आहे, ते जाणून घेऊन करणे किती दूर आहे ! ते होण्यासाठी प्रखर राष्ट्रनिष्ठा, जनतेप्रती प्रेम आणि पालकत्वाची भावना हवी ! तसे झाल्यास न्यायालयाला अशा गोष्टींत लक्ष घालावे लागणार नाही !

वाहतूक पोलिसांकडून संघटितपणे चालू असलेला प्रचंड भ्रष्टाचार !

वाहतूक विभागामध्ये काही भ्रष्ट कर्मचार्‍यांनी नवीन नवीन युक्त्या काढून भ्रष्टाचार वाढवला आहे. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आरोप

कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापिठातील कामात घोटाळा केल्याचा आणि चारचाकी वाहनांच्या ‘व्हीआयपी’ क्रमांकासाठी सहस्रो रुपये मोजले असल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.