दाभोलकरहत्या प्रकरणात निरपराध हिंदूंना गुंतवणार्या अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे प्रकाशन !

मुंबई, २७ एप्रिल (वार्ता.) – पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे यांच्या वडिलांचा आयुर्वेदीय औषधांचा कारखाना होता. त्यांची अनेक एकर शेती होती. ते आरामात जीवन जगू शकत होते; मात्र केवळ धर्म म्हणून हिंदुत्वासाठी त्यांनी स्वत:च्या जीवनाची अनेक वर्षे त्यांनी खर्ची केली. इतका अन्याय सहन करून विक्रम भावे गप्प बसले नाहीत. त्यांनी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडली. हिंदूंना अन्यायाविरोधात लढण्याची त्यांनी प्रेरणा दिली आहे. अन्वेषणयंत्रणा चुकीच्या वागल्या आणि हे गंभीर असेल, तर आपणही आवाज उठवायला हवा. दाभोलकरांची हत्या झाल्यावर गळा काढला गेला; पण साम्यवाद्यांनी देशात १४ सहस्रांहून अधिक हत्या केल्या, याविषयी माध्यमांनी दाखवले नाही. डॉ. दाभोलकर यांचे अनेक घोटाळे आम्ही बाहेर काढले. या घोटाळ्यांसाठी आम्ही त्यांना कारागृहातही टाकले असते. हत्या झाल्यामुळे दाभोलकर यांचे गांधींप्रमाणे उदात्तीकरण करण्यात आले. त्यांची खोटी प्रतीके निर्माण केली गेली, असे विधान हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात निरपराध हिंदूंना गुंतवणार्या अन्वेषण यंत्रणेची भांडाफोड करणार्या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे प्रकाशन २७ एप्रिल या दिवशी दादर (पश्चिम) येथील काशीनाथ धुरु सभागृहात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनावळेकर, राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे उपस्थित होते.
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना प्रारंभी श्रद्धांजली वहाण्यात आली. या वेळी सूत्रसंचालक श्री. दीप्तेश पाटील यांनी पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे, तसेच कठीण प्रसंगातही हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी धीरोत्तरपणे विक्रम भावे यांच्या पाठीशी उभ्या रहाणार्या त्यांच्या धर्मपत्नी सौ. वैदेही भावे आणि मुलगी कु. इंद्रश्री भावे यांचा परिचय करून दिला. या खटल्यात हिंदुत्वनिष्ठांची बाजू मांडणार्या अधिवक्ता सुवर्णा वत्स-आव्हाड आणि संत बी.पी. सचिनवाला उपस्थित होते.
हिंदू कधीच आतंकवादी असू शकत नाहीत ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

हिंदू कधीच आतंकवादी असू शकत नाहीत. हिंदू आतंकवादी असते, तर विक्रम भावे कधीच कारागृहात गेले नसते. आतंकवादी जर धर्म म्हणून हिंदूंना गोळ्या घालत असतील, तर धर्मासाठी हिंदू मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार का घालत नाहीत ? छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला. आज हिंदूंनी आर्थिक बहिष्कार घालून त्यांच्या पोटावरच आक्रमण करायला हवे. येत्या ५-१० वर्षांत महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढले नाही, तर सध्याचे सरकार हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरील.
विक्रम भावे यांचे पुस्तक म्हणजे हिंदूंची शौर्यगाथा ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीव सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

भविष्यात हिंदू नातवंडांना निश्चितच विक्रम भावे यांची कथा सांगतील. त्यांचे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या शौर्याची गाथा आहे. हे पुस्तक म्हणजे हिंदुत्वनिष्ठांवर उपकार आहेत. यापूर्वी विक्रम भावे यांनी ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक विदेशात लिहिले गेले असते, तर लेखकाला शोध पत्रकारितेचा पुरस्कार दिला गेला असता. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून सच्चर आयोगाला आव्हान, मंदिरांतील भ्रष्टाचाराच्या विरोधातीला लढा, भोंग्यांविरोधातील लढा आदी खटले लढलो असतांना डॉ. दाभोलकर यांसारख्या चिरकूट व्यक्तीच्या हत्येत आम्ही कशाला शिरू ? आम्हाला तुम्ही कष्ट द्याल, आमच्या घरावर धाड घालाल, संघटना उद्ध्वस्त कराल; परंतु आम्हाला घाबरवू शकत नाही. आम्ही ईश्वरावाचून कुणाला घाबरत नाही आणि ईश्वरावरही आम्ही प्रेम करतो.
हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी पुढाकार घ्या ! – विक्रम भावे, पुस्तकाचे लेखक

डॉ. दाभोलकरहत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मला आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अन् अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांना विनाकारण गोवून आमचा तीव्र मानसिक छळ केला. ‘सीबीआय’चे तत्कालीन अन्वेषण अधिकारी सुभाष रामरूप सिंग यात सहभागी होते. हे सर्व विषय पुस्तकात मांडलेले आहेत. पुस्तकाकडे हिंदुत्वनिष्ठाचे प्रातिनिधिक अनुभव म्हणून पहा. हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आपल्यालाच कष्ट घ्यावे लागतील.
दाभोलकरांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केल्याचे खोटे कथानक निर्माण करण्यासाठी काही लोक कार्यरत होते ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

डॉ. दाभोलकर यांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केली, असे नॅरेटिव्ह (खोटे कथानक) जाणीवपूर्वक पसरवण्यात आले. ते लोकांना पटण्यासाठी पोलीस यंत्रणा, राजकारणी आणि दुर्दैवाने माध्यमांतील काही लोक प्रयत्नरत होते. विक्रम भावे यांनी हे भोगले आणि त्यात ते होरपळलेही. केवळ अपमान नाही, तर त्यांना शारीरिक त्रास देण्यात आला. त्यामुळे हिंदूंनी हे पुस्तक वाचावे. हे पुस्तक घरोघरी पोचण्यासाठी सर्वांनी आवर्जून प्रयत्न करावेत.
ज्या भागात शक्य असेल, तेथे श्री. विक्रम भावे यांचे जाहीर अनुभवकथन आयोजित करा. चर्चासत्र आयोजित करा. महाराष्ट्रातील प्रत्येक वाचनालयात हे पुस्तक उपलब्ध होणे आवश्यक आहे. आपण हे धर्मकर्तव्य म्हणून केले पाहिजे.