पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांनी भारत देश सोडावा ! – हिंदू एकता मंच, बांदा  

प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – देशावर निस्सिम प्रेम करणारे देशभक्त आणि देशाप्रती असलेले दायित्व ओळखून हिंदू एकता मंच, बांदा घोषित करतो की, ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम येथे देशाच्या आत्म्यावर झालेल्या आक्रमणाला त्वरित प्रतिसाद देत सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले, त्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पहलगाम आक्रमणानंतर सावंतवाडी आणि बांदा येथे घडलेल्या घटना पहाता सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारचे आणखी कुणी पाकिस्तानप्रेमी आणि बांगलादेशप्रेमी रहात असतील, तर त्यांनी भारत देश सोडून पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांत निघून जावे. त्यांच्या प्रवासाचा येणारा सर्व खर्च हिंदू एकता मंचच्या वतीने करण्यात येईल. त्यांनी पुन्हा कधीही आमच्या देशात पाय ठेवू नये. एकदा सरकारने दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर, जर कोणी पाकिस्तानी किंवा बांगलादेशी नागरिक आम्हाला बांदा अथवा परिसरात सापडला, तर त्याला परत पाठवण्यात येईल, असे बांदा येथील माजी सैनिक नीलेश सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांनी म्हटले आहे.