महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही; सर्वांना पाकमध्ये पाठवू ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे – महाराष्ट्रात असलेले १०७ पाकिस्तानी नागरिक हरवले आहेत, अशी वृत्ते प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत; मात्र राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत, तेवढे सापडले असून ते बाहेर जात आहेत. सगळ्यांना पाकिस्तानात परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असून या सर्वांना उद्यापर्यंत पाकिस्तानात परत पाठवण्यात येईल. माध्यमांनी या संदर्भात वृत्ते देतांना काळजी घ्यावी, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुणे महानगरपालिकेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याविषयी ‘पुणे अर्बन डायलॉग’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संपादकीय भूमिका 

भारतातील पाकिस्तानी नागरिकांसह बांगलादेशी घुसखोरांनाही त्यांच्या देशात हाकलून देण्याची वेळ आली आहे !