किशनगंज (बिहार) येथे आग लागल्याने मंदिर जळून खाक !

गावकर्‍यांना संशय आहे की, मंदिराची तोडफोड करून त्यास आग लावण्यात आली. यामुळे त्यांनी येथे निदर्शने करून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून संपावर !

या संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.

संघाच्या शाखांमध्ये महिलांना प्रवेश देण्याविषयी होऊ शकतो निर्णय !

संघाकडून दुर्गावाहिनीसारखी संघटना महिलांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे आता थेट संघाच्या शाखेत महिलांना प्रवेश देण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.

संगमेश्‍वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी शासनाकडून १० कोटी रुपये संमत

ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांना मारले, त्या औरंगजेबाचे  थडगे जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज नगरातून उचकटून टाकत नाही, तोपर्यंत महाराजांचे बलीदान सार्थकी लागणार नाही.

अर्थसंकल्पामुळे कोकणात फळ प्रक्रिया उद्योगाला मिळेल चालना ! – अवधूत वाघ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते

भावी पिढी सुदृढ आणि निरोगी रहाण्यासाठी यापुढील काळात सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकर्‍यांना मुलभूत सुविधा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

३० मार्चपर्यंत आवश्यक त्या सुविधा न दिल्यास पेट्रोलपंपांवर होणार कारवाई !

स्वच्छ प्रसाधनगृह, वाहनतळ, वाहनांकरता हवा भरण्याची निःशुल्क सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि प्रथमोपचार पेटी प्रत्येक पेट्रोलपंपांवर असणे आवश्यक आहे, ज्यावर अशा सुविधा नसतील, त्यांवर धडक कारवाई केली जाणार.

हिंदु म्हणून एकत्र या अन् भगव्याची ताकद जगाला दाखवा !  

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कस जगावे ? हे शिकवले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी कसे मरावे ? हे शिकवले. हेच राजे आपले आदर्श आहेत.

एअर इंडियाच्या विमानात सिगारेट ओढणार्‍या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकाविरुद्ध गुन्हा नोंद

स्वतःसह विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार्‍या अशा व्यक्तींना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे !

बिलासपूर (छत्तीसगड) येथे अल्पवयीन मुलाकडून सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा अवमान !

सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रपुरुषांविषयी आदर न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !

‘ईडी’च्या धाडीतून लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या ६०० कोटी रुपयांच्या संपत्तीची माहिती उघड !

देशातील राजकारणी किती भ्रष्ट असतात, हे लालूप्रसाद यादव यांच्या एका उदाहराणावरून लक्षात येते ! देशातील प्रत्येक भ्रष्ट राजकारण्याकडे किती पैसे असतील याची कल्पनाच करता येत नाही !