ज्ञान, पदवी आणि संशोधन यांचा लाभ शेतकर्‍यांसाठी होणे, हेच खरे यश ! – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शेती, फलोत्पादन आणि मत्स्यपालनाचे महत्त्व सातत्याने अधोरेखित केले आहे.

शेतकर्‍यांची भूमी ‘कॉर्पोरेट’च्या घशात घालण्याचा डाव ! – विजू कृष्णन, राष्ट्रीय सचिव, किसान सभा

शेतकर्‍यांनी सजग रहावे, असे आवाहन १४ मे या दिवशी येथे झालेल्या ‘अखिल भारतीय किसान सभे’च्या राज्यव्यापी भूमी हक्क परिषदेमध्ये करण्यात आले

दोडामार्ग तालुक्यातील हत्ती हटवण्यासाठी पुन्हा आंदोलन केले जाणार !

तालुक्यातील हत्ती पकडा मोहीम राबवण्यासाठी येत्या ८ दिवसांत प्रयत्न झाले नाहीत, तर शेतकर्‍यांना घेऊन पुन्हा आंदोलन करू, अशी चेतावणी सरपंच सेवा संघटना सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवस यांनी दिली आहे.

हिंदूंच्या मंदिरनिधीतून शेतकर्‍यांची कर्जमाफी करणे कितपत योग्य ?

‘दैनिक प्रहार’मध्ये प्रकाश पोहरे यांनी लिहिलेल्या लेखात शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या. त्याच्या मते भारतात हिंदूंच्या मंदिरातील ‘कुजत’ असलेली संपत्ती कह्यात घेऊन..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनावर चुन्याच्या डब्या फेकल्या !

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर युवक काँग्रेस आणि किसान सभेचे कार्यकर्ते यांनी अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला

माकडांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ! – वनमंत्री गणेश नाईक

माकड आणि वानर यांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत निर्बीजीकरण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचार चालू आहे.

फळ पीक योजनेपासून शेतकरी वंचित राहिल्यास आंदोलन करणार ! – आमदार महेश सावंत, शिवसेना (ठाकरे गट)

ई-पीक नोंदणीची आयत्या वेळी सक्ती न करता जुन्या सातबाराच्या आधारावर शेतकर्‍यांना सरसकट फळ पीक विमा योजनेचा लाभ द्या. कुणालाही लाभापासून वंचित ठेवू नका. अशी मागणी त्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली.

प्रधान मुख्य वनसंरक्षकांची ‘हत्ती पकडा’ मोहिमेविषयी मोर्ले गावास भेट

मोर्ले गावात हत्तीच्या आक्रमणात मृत्यू झालेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केली. मृत शेतकर्‍याच्या कुटुंबाला हानी भरपाईची उर्वरित रक्कम लवकर दिली जाणार आहे, ‘हत्ती पकडा’ मोहीम राबवण्याच्या दृष्टीने हालचाली चालू आहेत. असे बेन यांनी सांगितले.

सांगली, जत, कवठेमहांकाळ येथे ३ स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात येणार !

मुख्यमंत्र्यांनी पुढील १०० दिवसांच्या कार्यक्रमात राज्यात नव्याने तालुकावार ६८ बाजार समित्यांची निर्मिती करायचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार आता राज्यात नवीन ६८ बाजार समित्या स्थापन होणार आहेत.

बांदा सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांनी शक्तीपीठ महामार्ग सीमांकन प्रक्रिया थांबवली !

सीमांकन प्रक्रियेपासून ग्रामपंचायत प्रशासनालाही अंधारात ठेवले ! – सरपंच, बांदा