नगर येथे विवाह सोहळ्यावर कारवाई करत वधूपित्याला १० सहस्र रुपयांचा दंड !

२ मे या दिवशी सकाळी साडेदहा वाजता लोकांची गर्दी जमवून विवाह समारंभ होत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलिसांनी पथकासह पाहणी करत मुलीच्या घरी विवाह आयोजित केल्याने वधूपित्याला १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.

मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !

भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.

एकच गोळी घेऊन कोरोना दूर करणार्‍या गोळीची फायझर आस्थापनाकडून चाचणी

औषध निर्मिती करणार्‍या फायझर आस्थापनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवल्यानंतर आता कोरोना झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यासाठी गोळी बनवली असून त्याची चाचणी सध्या चालू आहे.

भंडारा येथे रेमडेसिविरचा काळाबाजार केल्याप्रकरणी ३ महिला परिचारिकांसह ६ जणांना अटक

४ इंजेक्शन, ९० सहस्र रुपये रोख, दुचाकी, ३ भ्रमणभाष आणि औषध साठा असा १ लाख ७० सहस्र ९६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सार्वजनिक काका !

पुणे सार्वजनिक सभेचे (स्थापना – २ एप्रिल १८७०) यंदाचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक श्री. गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या कार्याचा हा अल्पसा परिचय !

माजी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम्. श्रीनिवास रेड्डी यांना न्यायालयीन कोठडी !

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेले प्रकल्प संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम्. श्रीनिवास रेड्डी यांची १ मे या दिवशी न्यायालयीन कोठडीत पाठवणी करण्यात आली.

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका !

वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रात गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी असतांना रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या स्थानांतरासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालकांना पाठवला होता. यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या संभाषणाचे ….

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियोजनबद्धतेमुळे कोरोनाबाधितांची संख्या घटली !

नंदुरबारने एप्रिलच्या प्रारंभी दिवसाला १ सहस्र २०० पर्यंत गेलेली नव्या रुग्णांची संख्या विविध प्रयोगांमुळे आता प्रतिदिन २५० आणि ३०० पर्यंत खाली आणली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियोजनबद्ध कामाचा हा परिणाम आहे. ऑक्सिजनच्या पूर्ततेविषयी नंदुरबार जिल्हा ५० टक्के स्वयंपूर्ण झाला आहे.

विनामूल्य भरपूर ऑक्सिजन आणि पर्यावरण संरक्षण यांसाठी भारतीय झाडे लावा !

येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर पिंपळ, नीम आणि वडाचे झाड लावले, तर प्रदूषणमुक्त भारत होईल. ज्यांच्या बाजूला जागा असेल, त्यांनी तुळस लावावी. आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या भारताला नैसर्गिक आपत्तीतून वाचवूया.

अमरावती जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी !

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १०६ गावे कोरोनाने सर्वाधिक प्रभावित गावांच्या सूचीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे या गावांमध्ये बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महसूल विभागाने हा आदेश काढला आहे.