दळणवळण बंदीच्या काळात २५ दिवसांत पोलिसांनी १ कोटी रुपयांचा दंड वसूल केला

दंड वसूल करणे हा आमचा हेतू नसून नागरिक नियम पाळत नसल्याने आम्हाला कारवाई करावी लागत आहे.

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार ! – दीपक शिंदे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ल्याने आता आरक्षण मिळवण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही भाजपचे मा. शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मराठा समाजास आरक्षण देण्याची … Read more

सतना (मध्यप्रदेश) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना भगवान श्रीरामाचे नाव लिहिण्याची शिक्षा !

पोलिसांनी नियम मोडणार्‍या नागरिकांना पकडून ३० ते ४० मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेण्याचा उपाय चालू केला आहे.

DRDO चे कोरोनावरील औषध ‘२ डीजी’ हे रुग्णांना वापरण्यासाठी उपलब्ध !

हे औषध पावडरच्या रूपात असणार आहे. हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व न्यून करते.

पुण्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन करत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत १२५ दुचाकींची रॅली

दळणवळण बंदी असतांना पुणे शहरात १०० ते १२५ दुचाकींच्या रॅलीमध्ये गुंडाची अंत्ययात्रा निघते, याचा अर्थ गुंडांना कायद्याचे भय राहिले नाही.

पँगाँग तलावाजवळील चीनच्या सैन्यतळाचे आधुनिकीकरण आणि सैनिकांची जमवाजमव  

चीनपासून भारताला प्रत्येक क्षण सावध रहाणे आवश्यक आहे .

वडाळा बहिरोबा (नगर) येथे विनापरवाना कोविड सेंटर चालू केल्याप्रकरणी मराठी मिशन संस्थेस नोटीस

या रुग्णालयाने कोविड रुग्णांवरील उपचारानंतरच्या वैद्यकीय कचर्‍याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावता सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला. नोटिसीमध्ये याचाही उल्लेख आहे.

गोमूत्र अर्क प्यायल्यामुळे कोरोना झाला नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे, असे मत भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.

सद्गुरु बाळूमामा फाऊंडेशनच्या वतीने भुदरगड (जिल्हा कोल्हापूर) येथील कोरोना रुग्णांसाठी भोजन व्यवस्था !

आपत्काळात सद्गुरु बाळूमामा फाऊंडेशनसारख्या संस्था नागरिकांचा आधार आहेत. कोरोना रुग्णांना साहाय्य करणार्‍या संस्था अथवा संघटनांंमध्ये हिंदु संस्थांचाच सहभाग अधिक असल्याचे दिसते, हे विशेष !

चीनकडे लिक्विड ऑक्सिजन नसल्याने त्यासाठी नेपाळची भारताकडे मागणी !

चीनच्या भरवश्यावर भारताला डोळे वटारून दाखवणार्‍या नेपाळला त्याच्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शेवटी भारताकडेच हात पसरवावे लागत आहेत,