कोरोनामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली !

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परिपत्रक काढले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून याविषयीची माहिती दिली.

लवकरच पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी विनंती करणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आरक्षणाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि केंद्रशासन यांचा आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रपतींना आमच्या भावना पत्राच्या स्वरूपात पोचवण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली.

दळणवळण बंदी त्वरित हटवली जाईल, अशी अपेक्षा करू नका ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

निर्बंध हळूहळू न्यून करण्याचे प्रयत्न होतील, असे माझे अनुमान आहे; पण पूर्ण दळणवळण बंदी काढून १०० टक्के मोकळीक होईल, असे होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. दळणवळण बंदी त्वरित हटवली जाईल, अशी अपेक्षा करू नका…

ईदच्या नमाजासाठी २५ लोकांना एकत्र येण्याची अनुमती द्यावी !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केलेल्या अवाहनानुसार हिंदूंनी त्यांचे सर्व सण-उत्सव घरात राहून साजरे केले आहेत. त्यामुळे प्रशासन आता नमाजपठणासाठी अनुमती देणार कि ते घरीच करण्याचा आदेश देऊन खर्‍या अर्थाने सर्वधर्मसमभाव दाखवणार ?

उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील वाचकांसाठी झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती

‘डिसेंबर २०२० मध्ये पाक्षिक हिंदी ‘सनातन प्रभात’च्या उत्तर आणि पूर्वाेत्तर भारतातील सर्व वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित केला होता. त्या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका न्यायालयात प्रविष्ट करणार ! – विजय वडेट्टीवार, मंत्री, मदत आणि पुनर्वसन

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात लवकरच पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार आहे. यासाठी निवृत्त न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल १५ दिवसांत येईल.

नेपाळमधील ओली सरकार कोसळले !

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने त्यांचे सरकार कोसळले. ओली यांना २३२ पैकी केवळ ९३ मते पडली, तर १२४ मते त्यांच्या विरोधात पडली. मतदानाच्या वेळी १५ खासदार तटस्थ, तर ३५ खासदार अनुपस्थित राहिले.

१५ मे या दिवशी चक्रीवादळाची शक्यता !

दक्षिण अरबी समुद्रात १५ मे या दिवशी चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अनेक राज्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असून ते पुढे उत्तर पश्‍चिमेला ……

श्रीनिवास रेड्डी यांना न्यायालयाकडून जामीन संमत !

मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने अंतरिम जामीन दिला आहे.

हिंदूंच्या सणांच्या वेळी सूट का नाही ?

धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी असतांना १४ मे या दिवशी रमझान ईद असल्याने १२ मे पासून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू रहातील, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढला आहे.