अमेरिकेतील विद्यापिठामध्ये हिंदु धर्म आणि जैन पंथ यांच्या अभ्यासासाठी पिठाची स्थापना !

अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयी अभ्यास केला जातो आणि त्यासाठी पिठाची स्थापना केली जाते. भारतात मात्र शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यावर कथित निधर्मीवादी, बुद्धीवादी आणि पुरोगामी याला विरोध करतात !

हिंदुत्वाचा आधारवड हरपला !

धर्मतेजाने हिंदु समाजाला असलेले धर्माविषयीचे अज्ञान दूर करणार्‍या या महान संत विभूतीच्या जाण्याने हिंदु समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे; देहाने जरी अस्तित्वात नसले, तरी निर्गुणातून त्यांचे कार्य चालूच रहाणार. धर्मरक्षणार्थ झटण्यासाठी त्यांनी धर्मप्रेमींना बळ आणि आशीर्वाद द्यावेत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !

भक्तीत वासना नसते ! – वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी

पुरोगामी म्हणवणारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर सतत गलिच्छ भाषेत लिहितात. अनेक नास्तिक मंडळीही ‘पुजार्‍यांवर विनयभंगाचे गुन्हे नोंद करा’ असली मागणी करतात, तर काही जण ‘देवीची पूजा बायकांनाच करू द्या’ अशाही मागण्या त्यात रेटवतात. अशा भंपक आक्षेपांचे खंडण येथे देत आहोत.

सातारा येथील राजवाडा बसस्थानकात साकारण्यात आलेले ‘शिव-समर्थ शिल्प’ कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येऊ नये !

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. काही समाजविघातक शक्तींकडून हे शिल्प हटवण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

(म्हणे) ‘पुजारी अर्धनग्न, मग भाविकांच्या कपड्यांवर निर्बंध का ?’

व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यांचा तिच्या मनावर परिणाम होत असतो. तोकडे कपडे परिधान केल्यामुळे मन चंचल होते. त्यामुळे मंदिर, तसेच धार्मिक कार्यक्रम यांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. अध्यात्माचा गंध नसल्यामुळे धार्मिक विषयावर बोलू नये, याचे सामान्य ज्ञान नसलेल्या तृप्ती देसाई !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना  करून सूक्ष्मातील कळायला लागले की,  यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’-  (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

हिंदुद्वेष्ट्या लेखिका अरूंधती रॉय यांनी जर्मन वृत्तवाहिनीवरून भारत शासनावर केलेल्या टिकेचे हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी केलेले खंडण

‘भारतात इस्लामद्वेषाची परिसीमा’ या कार्यक्रमात अरूंधती रॉय यांनी केलेल्या भारतविरोधी टीकेचे हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी केलेले खंडण प्रसिद्ध करत आहोत.

संशोधन न करणारे म्हणे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे  शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे आणि . . . शोधप्रबंध सादर केले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले