(म्हणे) ‘मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करणे, हा मूर्खपणा !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ

हिंदु धर्माविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना त्यासंदर्भात विधाने करून स्वतःचीच बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करणारे छगन भुजबळ स्वतःचेच हसे करून घेत आहेत ! यातून कोण मूर्खपणा करत आहे ?, हे सूज्ञ जनतेला ठाऊक आहे !

लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार ! – गोपीचंद पडळकर, आमदार 

पुणे येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरण घडल्याचा गोपीचंद पडळकरांचा पत्रकार परिषदेत दावा !

नागपूर येथील ४ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्‍या देवस्थानांचे अभिनंदन. असा निर्णय भारताचील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !

समष्टीच्या शुद्धीकरणासाठीच सनातन संस्थेचे कार्य चालू ! – विद्याधर नारगोलकर

हिंदूंनी भयावह परिस्थितीमध्ये काय करावे ? याचे मार्गदर्शन सनातन संस्था करते. हे एक प्रकारे समष्टीचे शुद्धीकरणाचेच कार्य चालू आहे. हे कार्य आपले आहे. ‘आता नाही तर परत कधीच नाही’, हे लक्षात घेऊन सर्वांनी दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

ऑस्ट्रेलियात मंदिरांवरील आक्रमणे खपवून घेतली जाणार नाहीत ! – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज

यापूर्वी ऑस्ट्रेलियात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे झाल्यावर ती रोखण्याचे आश्‍वासन ऑस्ट्रेलियाने दिले होते; मात्र त्यानंतरही आक्रमणे चालू आहेत. त्यामुळे अशा आश्‍वासनांवर किती विश्‍वास ठेवायचा ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उमटणारच !

दीपा चौहान यांचा बोलावता धनी कोण ? – विजय चौगुले, जिल्हाप्रमुख, शिवसेना

ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वी दीपा चौहान या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या आरोपातून गणेश नाईक यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे…

पुणे येथून गेल्‍या ३ मासांत ४४७ मुली आणि महिला बेपत्ता !

राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

निर्माते विपुल शाह यांनी धर्मांतराला बळी पडलेल्या २६ पीडित मुलींना समाजासमोर आणले !

ज्या महिला खरोखर धर्मांतराला बळी पडल्या आहेत, अशांपैकी २६ पीडित मुलींची आम्ही आज ओळख करून देत आहोत. ही केवळ केरळची गोष्ट नाही, तर संपूर्ण भारतात असे चालू आहे. चित्रपटात ३ मुलींच्या माध्यमातून सहस्रो मुलींची कथा आम्ही समोर आणली आहे, असे प्रतिपादन ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी केले.

यंदा गणेशोत्सवासाठी गोव्यात पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती उपलब्ध

श्री गणेश कला केंद्र, पुणे वर्ष २००७ पासून शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या, पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्तींचे उत्पादन करण्यात अग्रेसर आहे. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या १०० टक्के पर्यावरणपूरक आहेत.

खासगी शिकवणी घेणार्‍यांच्या विरोधात ‘दुहेरी शिक्षकविरोधी लढा कृती समिती’ याचिका प्रविष्ट करणार !

कोल्हापूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जे शिक्षक कार्यरत आहेत, ते सेवा-अटी यांचा भंग करून खासगी शिकवण्या घेतात. शासनाचा २६ एप्रिल २००० च्या परिपत्रकानुसार शाळेत शिकवणार्‍या शिक्षकास खासगी शिकवणी घेण्यास शासनाने अटकाव केला आहे.