छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थान, पाटेश्‍वर धाम, छत्तीसगड

जे धर्मांतरित झाले त्यांना दूर न लोटता त्यांना प्रेमाने जवळ करायला हवे. असे केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही. प्रभु श्रीराम यांनी वनवासाच्या काळात वानरांसह वनवासींना प्रेम देऊन आपल्या कार्यात जोडून घेतले. प्रभु श्रीरामांचा आदर्श घेऊन आपणाला कार्य करायचे आहे.

तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे यांचा सत्कार

नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केला, तसेच ‘गड-दुर्ग संवर्धन मोर्चा’ आणि आगामी चित्रपट ‘सुभेदार’ यांचे व्हिडिओ दाखवण्यात आले.

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण हटवून तेथे पुन्हा भगवा फडकाण्यासाठी संघर्ष चालूच रहाणार ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्रातील शौर्याचे प्रतीक असलेल्या गड-दुर्गांवरील आक्रमण म्हणजे लँड जिहादचा प्रकार आहे. गड-दुर्गांमुळे छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मरण होते. सध्याच्या स्थितीत तेथे मशीद, मजार, कबरी यांमुळे ‘ते मोगलांचे आहेत कि काय ?’, असे वाटते.

धर्मांतर रोखून सनातन धर्माचे रक्षण करू, अशी प्रतिज्ञा करा ! – पू. चित्तरंजन स्वामी महाराज, शांती काली आश्रम, अमरपूर, त्रिपुरा

मठ-मंदिरांमध्ये अनेक साधू-संत आहेत; परंतु तेथे येणार्‍या हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले जात नसल्याने धर्मांतराची समस्या फोफावली आहे. हिंदु धर्म वाचला, तर मठ-मंदिरे टिकणार आहेत. त्यामुळे प्रथम हिंदु धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करा.

हिंदूंच्या प्रतीकांना आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ! – दुर्गेश परूळकर, लेखक आणि व्याख्याते, ठाणे

औरंगजेब आपणाला प्रात:स्मरणीय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्यासाठी प्रात:स्मरणीय आहेत. आपल्या पूर्वजांनी दिलेली नावे पालटण्यामागे आपली संस्कृती नष्ट करणे, हे आक्रमकांचे षड्यंत्र होते.

यंदा गणेशचतुर्थीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना थारा नाही ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, गोवा हस्तकला महामंडळ

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. यामुळे या मूर्तींचे विडंबन होते आणि पर्यावरणाचीही हानी होते. यामुळे अशा गणेशमूर्तींची विक्री रोखण्यासाठी हस्तकला महामंडळ प्रयत्नशील रहाणार आहे.

आध्यात्मिक सौंदर्य आणि समृद्धता अनुभवली नसेल, तर भारताची भेट अपूर्ण राहील ! – मंत्री जी. किशन रेड्डी

आमच्याकडे ५० हून अधिक शक्तीपीठे आहेत, जिथे महिलांच्या दैवी सामर्थ्याची पूजा केली जाते. भारत हे शीख धर्माचे जन्मस्थान आहे आणि आमच्याकडे अमृतसर इथे शीख सुवर्ण मंदिर आहे, जे बंधुत्व आणि समतेचे प्रतीक आहे.

कळंगुट पंचायतीला पोर्तुगालच्या फुटबॉलपटूचा पुतळा चालतो, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का चालत नाही ?

‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या या प्रक्रियेसाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला त्याला कळंगुट पंचायतीचे आडमुठे धोरण उत्तरदायी आहे.’’

गोवा : शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर कळंगुटचे सरपंच सिक्वेरा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे

धर्म आणि राष्ट्र प्रेमी संघटित झाल्यास काय होऊ शकते ? याचे हे उदाहरण सर्वत्रच्या राष्ट्र-धर्मप्रेमींनी लक्षात ठेवावे !

जमावाकडून अनधिकृत मदरसा आणि गोमांस विक्रीची दुकाने यांवर दगडफेक करून प्रत्‍युत्तर

रूमडामळ (गोवा) पंचायतीचे पंचसदस्‍य विनायक वळवईकर यांच्‍यावर प्राणघातक आक्रमण झाल्‍याचे प्रकरण