समाजवादी पक्षाचे आमदार मेहबूब अली यांचे विधान !
अमरोहा (उत्तरप्रदेश) : मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. आता आम्ही (समाजवादी पक्ष) सत्तेत येणार आहोत. जे लोक आपला देश जाळत आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, भारतातील जनता आता जागरुक झाली आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून तसा कौल दिला आहे. वर्ष २०२७ च्या आधीच तुमचे (भाजप) सरकार जाईल, असे विधान येथील समाजवादी पक्षाचे आमदार मेहबूब अली यांनी पक्षाने आयोजित केलेल्या ‘संविधान सन्मान’ बैठकीत केले. भाजपने अली यांच्या विधानावर टीका केली आहे, तर पोलिसांनी अली यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची लोकसंख्या अल्प झाल्यावर भारत ‘इस्लामी देश’ होणार, हे लक्षात घ्या ! |