‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ षष्ठम दिवस – मान्यवरांचे विचार

मोगलांतील एकाही बादशहाने कोणतेही मानवतेचे कार्य केलेले नाही. मोगल बादशहाची ओळख क्रूरतेसाठी आहे. उलट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी राष्ट्र-धर्म आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. ताजमहल हा तेजोमहल आहे, कुतुबमीनार हा विष्णुस्तंभ आहे, तर तथाकथित ज्ञानव्यापी मशीद हे भगवान शिवाचे मंदिर आहे. आक्रमकांनी दिलेली नावे, हे आक्रमकांचे उदात्तीकरण आहे.

आपला इतिहास पराभवाचा नाही, तर विजयाचा आहे. शरद पवार यांना छत्रपती संभाजीनगरला ‘औरंगाबाद’ म्हणायचे असेल, तर त्यांनी अवश्य म्हणावे; परंतु माझ्यापुढे प्रश्न आहे की, ‘या राष्ट्राचा राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत कि औरंगजेब आहे ?’ ‘छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने हाल करून मारले, हे योग्य होते का ?’ ‘शरद पवार यांच्या मनात छत्रपती संभाजी महाराज यांच्यापेक्षा औरंगजेब याच्याविषयी आदरभाव आहे का ?’ देश स्वतंत्र झाल्यानंतर आक्रमकांनी ठिकाणांना दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. औरंगजेब आपणाला प्रात:स्मरणीय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्यासाठी प्रात:स्मरणीय आहेत. आपल्या पूर्वजांनी दिलेली नावे पालटण्यामागे आपली संस्कृती नष्ट करणे, हे आक्रमकांचे षड्यंत्र होते. त्यामुळे आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे वक्तव्य ठाणे येथील लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी केले.
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !