भारतीय वैज्ञानिकांचे संशोधन

लंडन (इंग्लंड) – कोरोनाकाळात लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्या काळात जगभरात दळणवळण बंदी होती. तिचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाला. या कालावधीत पृथ्वीवरील तापमान, तसेच प्रदूषण यांत घट नोंदवली गेली. त्याचा प्रभाव हा चंद्रापर्यंत झाल्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे. ‘रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात कोरोनाच्या काळात मुख्यत्वे एप्रिल-मे २०२० मधील कडक दळणवळण बंदीच्या कालावधीत चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात ८ ते १० अंशांची घट दिसून आली.
सौजन्य : Mirror Now
१. गुजरातमधील ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’चे दुर्गा प्रसाद आणि जी. अम्बिली या वैज्ञानिकांनी वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीत चंद्रावरील ६ वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे विश्लेषण केले.
२. यासंदर्भातील माहिती देतांना संस्थेचे संचालक अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, त्यांच्या वैज्ञानिकांच्या पथकाने अतिशय महत्त्वाचे काम केले आहे. हे एक वेगळे संशोधन आहे.
३. या संशोधनासाठी नासाच्या ‘लुनार रीकोनिसन्स ऑर्बिटर’चे साहाय्य घेण्यात आले.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !