सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांची हत्या कि आत्महत्या याच्या अन्वेषणाचे निष्कर्ष घोषित करावेत ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या अन्वेषणास प्रारंभ करून आता जवळपास ५ मास झाले आहेत; मात्र त्याची हत्या झाली होती कि त्याने आत्महत्या केली ? याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही.

भारतियांची नैतिकता रसातळाला ?

अमेरिकेत विवाहबाह्य संबंधांना ऊत आल्यावर तेथील सरकारने ‘बॅक टू फॅमिली’, ‘बॅक टू मदरहूड’ यांसारख्या चळवळी चालू केल्या. लोकांना लग्न टिकवण्यासाठी आवाहन केले. असे आवाहन भारतियांना करावे लागू नये, यासाठी विकृत मालिका, चित्रपट यांवर निर्बंध घालण्यासमवेत लोकांना नैतिकता वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

चित्रपटातील ‘आयटम डान्स’, अश्‍लील चित्रपटे बलात्काराची मानसिकता निर्माण करतात ! – राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी

बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना घडतात. यांसह समाजामध्ये नैतिकता निर्माण करण्यासाठी त्याला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. साधना शिकवली असती, तर असे घडले नसते !

‘ए.के. व्हर्सेस ए.के.’ या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची भारतीय हवाई दलाची मागणी

आक्षेपार्ह दृश्ये प्रसारित करून चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून द्यायची, असा नवा फंडा निर्माण झाला आहे. सातत्याने होणारे हे प्रकार लक्षात घेऊन असे प्रकार रोखण्यासाठी शासनाने ठोस धोरण निश्‍चित करणे आवश्यक आहे.

आसुरी वृत्तीचा कोण ?

हिंदु धर्माचे मर्म लक्षात घेऊन आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करूनच चित्रपट काढावा, अन्यथा हिंदू शांत बसणार नाहीत. धार्मिक इतिहासात फेरफार करणारे हेच हिंदूंच्या दृष्टीने दुष्प्रवृत्तीचे आहेत. अशांना वैध मार्गाने वठणीवर कसे आणायचे, याचे तंत्र हिंदूंना अवगत आहे, हेही संबंधितांनी जाणावे !

रावणाविषयी केलेल्या विधानावरून अभिनेते सैफ अली खान यांची क्षमायाचना

मी एका मुलाखतीमधून केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होऊन लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझा उद्देश असा कधीच नव्हता. मी सर्वांची मनापासून क्षमा मागतो. मी माझे विधान मागे घेत आहे. भगवान श्रीराम नेहमीच माझ्यासाठी धार्मिकता आणि वीरता यांचे प्रतीक राहिले आहेत.

(म्हणे) ‘रावण आसुरी वृत्तीचा नव्हता, तोही माणूस होता !’

रावण खलनायक आणि राक्षस होता, हे जगजाहीर असतांना अशा प्रकारचे त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न चित्रपटातून होत असेल, तर आताच हिंदूंनी या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवून तो रहित करण्यास निर्मात्यांना भाग पाडले पाहिजे !

चित्रपटसृष्टीची कथा !

सर्व पहाता चित्रपटसृष्टीची शुद्धी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजाच्या शुद्धीसाठी आणि त्याच्यावर सुसंस्कार करण्यासाठी हे अगत्याचे झाले आहे; कारण चित्रपट हे वैचारिक प्रबोधनाचे एक मोठे माध्यम आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते.

उत्तरप्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराची चित्रपटसृष्टी निर्माण करणार ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे १ सहस्र हेक्टरहून अधिक भूमीवर ही आंतरराष्ट्रीय स्तराची चित्रपटसृष्टी निर्माण करणार, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

‘मुकुठी अम्मान’ या तमिळ चित्रपटात हिंदु धर्म, देवता आदींचे विडंबन

तमिळ भाषेतील ‘मुकुठी अम्मान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदीतील ‘पीके’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘पीके’ चित्रपटात हिंदु देवता, गुरु आणि परंपरा यांचे मोठ्या प्रमाणावर विडंबन करण्यात आले होते, तर ‘मुकुठी अम्मान’ या चित्रपटातही असेच विडंबन काही प्रमाणात करण्यात आले आहे.