वैराग (जिल्हा सोलापूर) येथे गोरक्षकांनी वाचवले १३ गोवंशियांचे प्राण !

‘अनेकदा गोरक्षकच गोवंशियांचे प्राण कसे काय वाचवतात ? याचा विचार पोलिसांनी करायला हवा’, असेच गोप्रेमींना वाटते !

मिरज (जि. सांगली) : धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित असलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करावे, या मागणीचे निवेदन ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती मिरज’च्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले.

मीरारोड येथील ख्रिस्त्यांच्या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाची पोलिसात तक्रार !

मीरारोड येथील एन्.एच्. मैदानावर २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ‘बायबल कन्व्हेंशन मीरारोड २०२२’ या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

वीजदेयक भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या दोघांना झारखंडमधून अटक !

अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

पुणे येथे ‘राष्ट्र निर्माण संघटने’च्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ सभा !

पुणे येथील बी.एम्.सी.सी. कॉलेज, डेक्कन येथे २८ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता प्रखर राष्ट्रवादी पत्रकार श्री. सुरेश चव्हाणके यांच्या ‘राष्ट्र निर्माण संघटन महाराष्ट्र’च्या वतीने हिंदु राष्ट्राची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भाईंदरच्या खाडीत देहली पोलिसांकडून शोधमोहीम !

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात देहली पोलिसांनी आता भाईंदरच्या खाडीत शोधमोहीम चालू केली आहे. आफताबच्या भ्रमणभाषचे ‘लोकेशन’ खाडी परिसरात आढळल्यानंतर संशय बळावला होता. श्रद्धाचा भ्रमणभाषसंच किंवा अन्य काही पुरावे त्याने खाडीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे.

मुंबई : ५८ लाख ५० सहस्र रुपयांचे अवैध ‘ई-सिगारेट’ जप्त !

केंद्र सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातलेली असतांना त्या मालाची इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होतेच कशी ? यावर पोलिसांचे नियंत्रण का नाही ?

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रसारासाठी २५ नोव्हेंबर या दिवशी वाहनफेरी काढण्यात आली.

शवागारातील वातानुकूलन यंत्र बंद पडल्याने मृतदेह कुजून परिसरात दुर्गंधी !

येथील जिल्हा रुग्णालयातील शवागाराची वातानुकूलित यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे अनेक मृतदेह कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

इतिहासाचे पुनर्लेखन हवेच !

साम्यवादी इतिहासकारांनी त्यांच्या पूर्वग्रहदूषित आणि हिंदुद्वेषी मानसिकतेच्या चष्म्यातून भारतीय इतिहासाकडे पाहिल्याने त्यांना येथील पराक्रमी राजे दिसलेच नाहीत किंवा त्यांना मोगल ‘प्यारे’ वाटले. आता शासनांनी दैदीप्यमान अन् गौरवशाली इतिहास भारतियांना अवगत करावा, ही अपेक्षा !