गूगल भाषांतराच्या मर्यादेमुळे भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसे यांचा नावाचा आक्षेपार्ह अर्थ !

गृहमंत्र्यांच्या पोस्टवर रक्षा खडसे म्हणाल्या, त्यांनी आक्षेपार्ह उल्लेखाची नोंद घेतली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्यांनी ती पोस्ट इतरांना पाठवायला नको होती.

३ फेब्रुवारीपासून कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस चालू

कोल्हापूर-तिरुपती मार्गावर ३ फेब्रुवारीपासून रेल्वे सेवा चालू करण्यात येणार आहे. याच्या तिकिटाची नोंदणी ४ दिवसांत चालू होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.

देहलीत हिंसा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

देहलीच्या हिंसाचार प्रकरणी कृषी कायद्याला विरोध करणार्‍यांना पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

साम्यवाद , लोकशाही आणि विज्ञानवाद यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने देशाला नवी दिशा शोधावी लागेल ! – गिरीश पुजारी, मुख्य समुद्री अभियंता

साम्यवादी विचारातून हुकूमशाही, लोकशाही मार्गाने भांडवलशाही, तसेच विज्ञानवादाने भोगवाद निर्माण होत आहे. हे आज स्पष्ट झाल्याने देशाला नवी दिशा शोधावी लागेल.

बालभारतीच्या कार्यालयासमोरच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात घोषणा

शालेय शिक्षणमंत्री पुण्यात आल्या असतांना शाळांकडून वाढवण्यात आलेले शुल्क आणि इतर मागण्या यांचे निवेदन पालकांच्या संघटनेने त्यांना दिले; मात्र त्यांच्या कडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालक आक्रमक झाले.

कलेचा वापर भारतमाता आणि हिंदूंच्या देवतांची विटंबना यांसाठी करणे अयोग्य ! – पद्मश्री पुरस्कारप्राप्त परशुराम गंगावणे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती  समिती यांच्या वतीने श्री. परशुराम गंगावणे यांच्या पिंगुळी गुढीपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.

म्हादईप्रश्‍नी आवश्यकता भासल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ देहलीला नेणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

म्हादईप्रश्‍नी गोवा शासन सुस्त धोरण अवलंबत असल्याच्या आरोपावरून विरोधी सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

हिंसेला प्रवृत्त करणार्‍या दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांवर बंदी घाला ! – सर्वोच्च न्यायालय

‘कुणाला हिंसेसाठी भडकवणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे; पण केंद्र सरकारने याविषयी काहीच पावले उचलेली नाहीत, असे दिसते’, अशा शब्दांत न्यान्यालयाने अप्रसन्नता व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाकडून तांडव वेब सिरीच्या निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार

वेब सिरीज तांडवचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता यांच्या अटकेला स्थगिती देण्याची ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’ने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

क्रांतीवर दीपाजी राणे यांच्या क्रांतीला राष्ट्रीय मान्यता द्या !

क्रांतीवीर दीपाजी राणे यांनी पोर्तुगिजांच्या विरोधात नाणूस किल्ल्यावर क्रांती केली होती. या पहिल्या सशस्त्र क्रांतीला संपूर्ण भारतात प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे या क्रांतीला राष्ट्रीय मान्यता द्यायला हवी, अशी मागणी मराठी राजभाषेचे कार्यकर्ते मच्छिंद्र च्यारी यांनी केली.