
मिरज, २८ जानेवारी (वार्ता.) – स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लोकशाही मार्गाने चाललो आहोत; परंतु लोकशाहीत वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वार्थी वृत्ती आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे. कर्तव्याचा विसर पडल्याने स्वार्थी आणि वितंडवादी संघटना लोकशाहीत समाजविघातक कृत्ये करून समाजाला वेठीस धरत आहेत. साम्यवादी विचारातून हुकूमशाही, लोकशाही मार्गाने भांडवलशाही निर्माण होणे, तसेच विज्ञानवादाने भोगवाद निर्माण होत आहे. अशा मर्यादा आज स्पष्ट झाल्याने देशाला नवी दिशा शोधावी लागेल, असे प्रतिपादन मुख्य समुद्री अभियंता श्री. गिरीश पुजारी यांनी केले.
गुजरात ते मुंबई या समुद्रातील प्रवासमार्गात एम्.टी. सक्सेस, जहाजावर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने झेंडावंदन कार्यक्रम झाल्यानंतर श्री. पुजारी यांनी जहाजावर सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना संबोधित करतांना वरील मत व्यक्त केले.
१. वैज्ञानिकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर झाल्याने जगाची वाटचाल जैविक युद्धाकडे चालू आहे.
२. योगी अरविंद यांनी वर्ष १९४५ मध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भारताच्या पुनर्निर्माणातून देश जगाचे नेतृत्व करेल, असे सांगितले होते.
३. राष्ट्रीय प्रतीक असलेली सन्मानचिन्हे, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रभाषा आणि भारतीय संस्कृती यांचा अभिमान जागवून देशभक्ती वाढवूया.
क्षणचित्र – झेंडावंदन झाल्यानंतर जहाजाचे कप्तान श्री. दीपक सिंह आणि जहाजावरील सर्व सहकारी, कर्मचारी यांनी सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
भाववाढ झाली असली, तरी ठेकेदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार !