शाळांकडून मनमानी पद्धतीने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात पुण्यातील पालक आक्रमक

पुणे – येथील खासगी शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वाढ करण्यात आली आहे. २७ जानेवारी या दिवशी बालभारती संस्थेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पुण्यात आल्या असतांना शाळांकडून वाढवण्यात आलेले शुल्क आणि इतर मागण्या यांचे निवेदन पालकांच्या संघटनेने त्यांना दिले; मात्र गायकवाड यांच्याकडून या संदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालक आक्रमक झाले आणि त्यांनी बालभारतीच्या कार्यालयासमोरच वर्षा गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यास प्रारंभ केला.
यावर खासगी शाळांनी मनमानी पद्धतीने शुल्क वसुल करू नये, यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली होती; मात्र त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे गायकवाड यांनी पालकांना सांगितले. खासगी शाळांच्या मनमानीविषयी ठोस निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही, तर ३० जानेवारीला वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असे पालक संघटनांच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे यांनी सांगितले.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव