म्हादईसंबंधी दिलेल्या अहवालावर ‘एन्.आय.ओ.’ने स्पष्टीकरण द्यावे !
पणजी येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या ३ शास्त्रज्ञांनी ‘म्हादईचे पाणी वळवल्यास त्याचा गोव्यावर परिणाम होणार नाही’, असा अहवाल दिला आहे. या अहवालाचा राज्यभरातील विविध संघटनांकडून निषेध केला जात आहे.