गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक

ज्याप्रमाणे मुलाला बोलायला शिकवतांना प्रारंभाला लहान शब्द शिकवतात, चालायला शिकवतांना हळूहळू चालवतात,तसेच गुरुही शिष्याला टप्प्याटप्प्याने हळूहळू शिकवतात.

सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !

सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !

‘जीवन-मरण, चांगले-वाईट आणि ज्ञान–अज्ञान यांच्या मिश्रणालाच ‘माया’ किंवा ‘प्रकृती’ असे म्हणतात. तुम्ही सुखाच्या शोधात अनंत काळ फिरत राहिला,

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.

क्रियायोग 

क्रियायोग 

सर्व क्रियांमध्ये भगवंत पहाणे, म्हणजे ‘क्रियायोग’ होय. ‘सर्व क्रिया भगवंताच्याच आहेत’, असा दृढनिश्चय झाला म्हणजे ‘क्रियायोग’ साधला. भगवंताची चव स्वयमेव असल्याकारणाने त्याला लौकिक कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही.

सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !

सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !

‘सर्वसाधारण व्यक्ती बुद्धिनिष्ठ असते. ती ‘मला वाटते, तेच खरे’ अथवा ‘मला ‘हे’, ‘ते’ सर्वच कमवायचे आहे’, या विचारसरणीची असते, तर साधक ‘मला सर्व गोष्टींचा त्याग करून पुष्कळ शिकायचे आहे’, या विचारसरणीचा असतो.’

गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक

संन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो. गुरूंशिवाय संन्यास घेऊन गेल्यास काही जण हिमालयात थंडीने किंवा इतरत्र उपासमारीने मरतातसुद्धा.

मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !

मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !

‘तुम्ही स्वतःचा मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर या सार्‍यांचा कायमचा त्याग करावा’, हीच तुमच्यापासून अपेक्षा आहे. तुमच्या ठायी पृथ्वीमातेप्रमाणे सहनशीलता बाणवली पाहिजे.