प्रदूषण नियंत्रण; पण सोयीनुसार !
सण-उत्सव कोणत्याही धर्माचा असो, त्यातून प्रदूषण होत असेल, तर ते रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचा शुद्ध हेतू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार यांनी बाळगायला हवा. केवळ हिंदु सणांच्या वेळी आवई उठवायची आणि वर्षभर होणार्या प्रदूषणाकडे डोळेझाक करायची ? अशाने प्रदूषण थांबणार नाही.