राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने हिंदु धर्मावरील आघात रोखण्याचे कार्य चालू ! – मनोहर सिंह घोडीवारा, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय राजपूत करणी सेना, राजस्थान

आम्ही धर्मासाठी सर्वकाही करायला सिद्ध आहोत, असे उद्गार त्यांनी काढले

तमिळनाडू आतंकवाद्यांचा कारखाना होत आहे ! – पाळा संतोष कुमार, संस्थापक अध्यक्ष,  हिंदू येलूच्ची पेरवाई, तमिळनाडू

हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांना खोट्या खटल्यांमध्ये गुंतवून अटक करण्यात येत आहे. धर्मकार्यावरील हे आघात आम्हाला हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.विवेकानंद यांनी युवकांना जागरूक केले, त्याप्रमाणे संघटनेद्वारे युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य चालू आहे, असे उद्गार त्यांनी काढले

झोपलेल्या हिंदूंना जागे करून संपूर्ण विश्वामध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – हरिश जोशी, प्रदेश महामंत्री, श्रीराम युवा सेना, मध्यप्रदेश

आम्हीही गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यांच्या विरोधात कार्य करतो.  हिंदुत्वाचे कार्य करत असल्याने माझ्यावर आणि माझ्या भावावर विरोधकांनी आक्रमणे केली; पण ईश्वराच्या कृपेने त्यातून आमचे रक्षण झाले. असे ते म्हणाले

संभाजीनगर येथे अडीच मासांचे बाळ ५ लाख रुपयांत विकले !

२० जूनच्‍या सकाळी ११ वाजण्‍याच्‍या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. दिलीप राऊत (वय ५२ वर्षे) आणि त्‍याची पत्नी सविता यांना पोलिसांनी कह्यात घेतले असून आश्रमावर बंदी घातली आहे.

काश्मीरमधून भगवा नष्ट झाल्यामुळे नंतर तेथे तिरंग्यालाही स्थान राहिले नाही ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक, भोपाळ

एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. असे परखड उद्गार त्यांनी काढले

वारकर्‍यांसाठी महाराष्‍ट्र शासनाची विमा संरक्षण योजना !

या योजनेंतर्गत या कालावधीत एखाद्या वारकर्‍याचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍यास कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्‍यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्‍व आल्‍यास १ लाख आणि अंशत: अपंगत्‍व आल्‍यास ५० सहस्र रुपये, तसेच वारीच्‍या कालावधीत आजारी पडल्‍यास औषधोपचारासाठी ३५ सहस्र रुपयांपर्यंत खर्च मिळेल

मुख्‍यमंत्र्यांच्‍या दसरा मेळाव्‍याविषयी याचिकाकर्त्‍याला प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याचे न्‍यायालयाचे आदेश !

या कार्यक्रमासाठी एकूण १० कोटी रुपये खर्च झाला, असा आरोप याचिकाकर्त्‍याने केल्‍याने न्‍यायालयाने याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

मांजरी (छत्रपती संभाजीनगर) येथील धार्मिक कार्यक्रमातील जेवणामधून विषबाधा !

या कार्यक्रमामध्‍ये दुपारी अनेक जणांनी जेवण केले. रात्री हेच जेवण कुटुंब आणि नातेवाईक यांनी पुन्‍हा केल्‍यानंतर त्‍यातील १६ जणांना जुलाब आणि उलटी यांचा त्रास चालू झाला.

मुंबईत महामार्गावर घोड्यांची शर्यत लावणार्‍या चौघांना अटक !

या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४ जणांना अटक केली आहे. इतर वाहनेही या महामार्गावरून धावत होती. या वेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. अन्‍यथा मोठा अनर्थ ओढवला असता.

अमरावती येथे विवाहितेचे लैंगिक शोषण करून फेसबुकवरून ३५ तुकडे करण्‍याची धमकी !

पीडितेचे पतीविरोधात कौटुंबिक छळाचे प्रकरण न्‍यायप्रविष्‍ट आहे. त्‍यातच मयूर नावाच्‍या युवकासमवेत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्‍या कालावधीत मयूरने पीडितेचे लैंगिक शोषण केले.