गुरुपौर्णिमेला ४ दिवस शिल्लक

जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात. मग ते उत्तमप्रकारे तत्त्वबोध देऊन संसाररूपी दुःखसागरातून त्या शिष्यांचा उद्धार करतात

वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी ३० जूनला पंढरपूर येथे भव्य वारकरी अधिवेशन ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

अधिवेशन परमपूज्य श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

कुराणवर लहान माहितीपट बनवून त्यात चुकीचे दाखवा, मग पहा काय होते ?

चित्रपटात रामायणातील पात्रे अशी का दाखवली आहेत ? मी काही लोकांना विचारले, ते चित्रपट पाहून पुष्कळ दुखावले गेले. आज आपण गप्प राहिलो, तर काय होईल माहिती आहे का ?, हे सर्व वाढत आहे.

बंगालमध्ये सरकारी नोकरीमध्ये बंगाली भाषा येणे अनिवार्य ! – तृणमूल काँग्रेस सरकारचा निर्णय  

राज्य सरकारच्या वतीने चालवल्या जाणार्‍या हिंदी, उर्दू आणि संथाली माध्यमांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत बंगाली भाषा शिकणे सक्तीची करावी, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

कोकण रेल्वेमार्गावर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला प्रारंभ : रत्नागिरीत जोरदार स्वागत

दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आलेल्या वन्दे भारत एक्सप्रेसचे ढोल-ताशाच्या गजरात आणि फुलांचा वर्षाव करत रत्नागिरीवासियांनी जोरदार स्वागत केले.

अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणार्‍या अश्रफ शेखला अटक

शहरातील मासळीबाजारातील खान कॉम्प्लेक्स येथे अवैध अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून शेखला अटक केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आत्मनिर्भर आणि लोककल्याणकारी भारत देश जगासमोर ! – नारायण राणे, केंदीय उद्योगमंत्री

वर्ष २०२४ ची निवडणूक जिंकून पुन्हा मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे काम घराघरांत पोचवा, असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.

कावड यात्रेच्या मार्गावरील मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रशासनाला आदेश !

येत्या ४ जुलैपासून उत्तरप्रदेशात कावड यात्रेस प्रारंभ होत आहे.

कोणताही देश भारताविरुद्ध श्रीलंकेचा वापर करू शकणार नाही !  

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे आश्‍वासन !

५०० कोटी रुपयांच्या बेहिशोबी रकमेच्या प्रकरणी ‘ईडी’च्या माजी अधिकार्‍याला ईडीकडून अटक !

अशा भ्रष्टाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे !