संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये तुर्कीयेने काश्मीरप्रश्‍नी पाकची ‘री’ ओढली !

याला म्हणतात कुत्र्याची शेपटी किती सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती वाकडीच रहाते ! भारताने भूकंपाच्या काळात तुर्कीयेला साहाय्य करूनही तो अजूनही पाकच्याच नादी लागलेला आहे, हे स्पष्ट होते !

पंजाबच्या प्रत्येक घरात स्फोटके बनवली जात असून त्याच्या स्फोटात मुख्यमंत्री मान आणि गृहमंत्री अमित शहा यांची राजकीय हत्या होईल ! – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू

खलिस्तान्यांची देशद्रोही चळवळ आता चिरडून टाकण्याची वेळ आली आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !

छत्रपती संभाजीनगरचे ‘औरंगाबाद’ नामकरण करण्यासाठीच्या उपोषणात झळकावली औरंगजेबाची भित्तीपत्रके !

छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारणारा आणि लक्षावधी हिंदूंची क्रूर हत्या अन् सहस्रों मंदिरांचा विध्वंस करणारा औरंगजेब इम्तियाज जलील यांना किती ‘प्रिय’ आहे, हे या उपोषणावरून लक्षात येते.

चीनने पाकिस्तानला पुन्हा दिले ४ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज !

पाकिस्तान आता अशाच प्रकारच्या भिकेवर जगणारा देश म्हणून काही मास ओळखला जाईल आणि नंतर त्याचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून संपुष्टात येईल, हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता राहिलेली नाही !

कोरोनाच्या उत्पत्तीविषयीची माहिती आम्हाला द्या ! – जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व देशांना आवाहन

कोणत्याही देशाकडे कोरोनाच्या उत्पत्तीशी संबंधित काही माहिती असल्यास त्यांनी ती आम्हाला द्यावी. आम्हाला केवळ हे जाणून घ्यायचे आहे की, महामारी कशी आणि कुठे प्रारंभ झाली ? आम्हाला काही ठोस माहिती मिळाल्यास आम्ही आगामी काळात येणारी महामारी टाळण्याचे मार्ग शोधू शकतो.

ब्रिस्बेनच्या लक्ष्मीनारायण मंदिरावर लिहिण्यात आल्या पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा !

हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानवाद्यांकडून होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंवर होणारी आक्रमणे रोखण्यात ऑस्ट्रेलियातील सरकारला येत असलेले अपयश लज्जास्पद आहे ! भारत सरकारने याविषयी जाब विचारणे आवश्यक आहे !

राज्यातील सर्व क्षेत्रांना वर्ष २०५० पर्यंत १०० टक्के अक्षय्य ऊर्जा उपलब्ध करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोवा सरकारने वीज, वाहतूक, मासेमारी, कृषी, उद्योग आणि इतर क्षेत्र यांसाठी ‘ऊर्जा कृती योजना’ आखली आहे. संबंधित क्षेत्रांची उपयुक्त माहिती गोळा करून, तसेच तज्ञांकडे विचारविमर्ष करून ही योजना आखण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशातील काही ठिकाणी होळीच्या पार्श्‍वभूमीवर झाकल्या जात आहेत मशिदी !

हिंदूंच्या सणांच्या संदर्भात पोलिसांच्या बैठकीत अशी धमकी देण्याचे धाडस होते आणि भाजपचे सरकार असतांना पोलीस त्याला अटक करत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

राज्यात श्वान दत्तक योजना चालू करणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, पशूसंवर्धन मंत्री  

महाराष्ट्रातील विविध शहरे आणि ग्रामीण भाग येथे एकूण १२ लाख भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. या भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक शहरांत भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणांत वाहनधारकांचा अपघात होऊन काही लोक घायाळ झाले आहेत.

गोवा : अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांचा केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वारंवार तक्रार करूनही अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष होणे, ही प्रशासनाची निष्क्रीयता आहे कि त्यांचे अवैध कृत्य करणार्‍यांशी साटेलोटे आहे ?