रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे महाराज संतपदी विराजमान !

धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम बांद्रे महाराज संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.

‘सनातन प्रभात’च्या आवृत्त्यांचे पुन:श्‍च हरिओम !

कोरोनाचे संकट काहीसे अल्प झाल्याने १० मासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी २०२१ चा अंक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने प्रारंभ झालेली ही घौडदौड वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत चालूच रहाणार आहे ! – संपादक

देहलीमधील हिंसाचारामध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान ! – पंतप्रधान मोदी

ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दु:खी आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केले; मात्र त्यांनी शेतकरी आंदोलनाचा कुठलाही उल्लेख केला नाही.

पुण्यातील एल्गार परिषदेत झळकले कोरेगाव भीमा दंगलीतील संशयित आरोपींचे ‘पोस्टर ’

संशयित आरोपींचे पोस्टर लागूनही पोलिसांनी परिषदेच्या आयोजकांवर कारवाई का केली नाही ?  

(म्हणे) ‘राष्ट्रध्वजाचा अपमान करणार्‍याला अटक करा !’ – राकेश टिकैत, शेतकर्‍यांचे नेते

शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये समाजविघातक घटक घुसल्याचे पुढे आल्यावर टिकैत यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांना रोखण्यासाठी काहीही केले नाही, हेच खरे !

आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होऊन ती आपोआप सात्त्विक पर्याय निवडते ! – शॉन क्लार्क

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘उद्योगांचा समाजावर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’ या विषयावरील संशोधनाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

राष्ट्ररक्षणाचे धडे देऊन राष्ट्रप्रेमी युवा पिढी सिद्ध केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’, असे नामकरण केले. आपल्याला ‘इंडिया’ या शब्दामुळे गुलामगिरीची जाणीव होते. आपली ही मानसिकता पालटण्यासाठी आपण ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ असेच संबोधणे आवश्यक आहे.

यवतमाळ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गोळा झालेले राष्ट्रध्वज शासनाला सुपुर्द !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये ‘राष्ट्रध्वज सन्मान पेटी’ फिरवण्यात आली. त्यात खराब झालेले, खाली पडलेले आणि नागरिकांनी दिलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यात आले.

ऐतिहासिक वास्तू, दुर्ग आणि गड पर्यटकांसाठी खुले ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

जिल्ह्यातील प्रतिबंधक क्षेत्र वगळून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

आयुक्तांच्या नावे खोटे फेसबूक खाते उघडून पैशांची मागणी

केवळ बनावट खाते बंद करण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा असे गुन्हे करण्याचे गुन्हेगारांचे धैर्य होणार नाही, अशी कडक कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे !