कोटीशः प्रणाम !

• कोनाळ, दोडामार्ग येथील श्री सातेरी भूतनाथ पंचायतनाचा आज वार्षिक जत्रोत्सव !
• गोवा येथील सनातनच्या २१ व्या संत पू. (श्रीमती) सीताबाई मराठे यांची आज पुण्यतिथी

आयकरामध्ये कुठलीही नवीन सुट नाही !

लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. प्रथमच ‘पेपरलेस’ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यासाठी  सीतारामन् यांच्याकडून ‘मेक इन इंडिया’ ‘टॅब’चा वापर करण्यात आला.

दळणवळण बंदीच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कह्यात घेतली ११७ एकर भूमी !

देवस्थानाला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या भूमीविषयी असा गैरकारभार हे सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

म्यानमारमध्ये सैन्याकडून सत्तापालट !

म्यानमारचे राष्ट्रपती विन म्यिंट, सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांना सैन्याकडून अटक करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीला धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.

(म्हणे) ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे !’

एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याची हिंदुद्वेषी गरळओक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कोणीही येऊन हिंदूंची अपकीर्ती करून जातो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, हे संतापजनक नाही का ?

‘ओटीटी’ माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमावली करणार ! –  प्रकाश जावडेकर

वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि राष्ट्रविरोधी असणार्‍या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !

(म्हणे) ‘अण्णा हजारे हे अविश्‍वासू !’- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर

अण्णा हजारे यांनी काय करावे आणि ते कसे आहेत, हे देशाची सर्वाधिक हानी करून देशाला रसातळाला नेणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. अण्णा हजारे यांनी काय करावे आणि काय करू नये, याचे स्वातंत्र्य त्यांना नाही का ?

आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य, हेच खरे साहाय्य ! – सौ. ड्रगाना किस्लौस्की

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा ६६ वा शोधनिबंध होता. यापैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांतील शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

(म्हणे) ‘किसान मोर्चाच्या लोकांवर खोटे गुन्हे नोंद केले !’ – मेधा पाटकर यांचा आरोप

देहलीच्या रस्त्यावर बॅरिकेट तोडणे, ट्रॅक्टर गोल फिरवणे, दगडफेक आदी केलेले समाजविघातक प्रकार हे गुन्हे नोंद करण्यालायक नाहीत का ? संयुक्त किसान मोर्चात अन्य लोक सहभागी होते, तर त्यांना सहभागी न होऊ देणे हे मोर्चाचे दायित्व नव्हते का ?

गंगापूर येथे भव्य मिरवणुकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची स्थापना

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूच्या अश्‍वारूढ पुतळ्याची ३० जानेवारी या दिवशी भव्य मिरवणुकीद्वारे स्थापना करण्यात आली