नारायणगाव (पुणे) येथील कापड दुकानाला भीषण आग !

नारायणगाव बसस्थानकाशेजारी असलेल्या धवल चव्हाण यांच्या ‘अष्टविनायक रेडिमेडस्’ या कापड दुकानाला १८ मार्चला पहाटे ४.३० वाजता आग लागली. आगीमध्ये दुकानदाराची ५ कोटी रुपयांची हानी झाली.

औष्णिक विद्युत् केंद्रातील राखेसाठी नवीन समान धोरण अमलात आणू ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्याची विक्री करण्याचे समान धोरण आखले जाईल. ते योग्य पद्धतीने राखेची विल्हेवाट लावेल आणि भ्रष्टाचारमुक्त असे असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देत होते.

बीड येथील ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट’च्या ठेवीदारांचे पैसे परत देऊ ! – मुख्यमंत्री

बीड जिल्ह्यातील ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. सो.लि.’ या अधिकोषाच्या (बँकेच्या) संचालकांच्या ८० मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांची विक्री करण्याचा गुन्हे शाखेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

पुणे शहरातील ‘कोयता गँग’मागील ‘सूत्रधारां’वर कडक कारवाई करणार ! – मुख्यमंत्री

पुण्यात कोणतीही ‘कोयता गँग’ अस्तित्वात नाही. विधीसंघर्षित मुले हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. सराईत गुन्हेगार या मुलांना हाताशी धरून दहशत निर्माण करून हप्ते गोळा करतात.

रासायनिक खतांचा अतीवापर : ७ जिल्ह्यांतील भूजल पिण्यास अयोग्य

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी न मिळणे हे लाजिरवाणे !

खडकवासला येथे शासकीय मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थिनी दूषित पाण्यामुळे आजारी पडल्याच्या तक्रारी !

वसतीगृहातील पिण्याच्या पाण्यामुळे विद्यार्थिनी आजारी पडल्या, तरी जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; मात्र विद्यार्थिनींना त्रास झाल्याचे वास्तव समोर असून याविषयी अजून सखोल चौकशीची आवश्यकता आहे, असे जनतेला वाटते.

धर्मांधांनी महिलेला पळवून नेण्याचा प्रयत्न करून केला छळ !

लोकसंख्येत अल्पसंख्य; परंतु गुन्हेगारीत पुढे असलेले धर्मांध ! पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा देणे अपेक्षित !

प्रसिद्धीमाध्यमांचे हिंदुविरोधी कथानक (नॅरेटिव्ह) जाणा !

पुरोगामी आणि साम्यवादी यांच्या कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती असूनही प्रसिद्धीमाध्यमांनी या वृत्ताला मोठी प्रसिद्धी दिली.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टळली !

सत्र न्यायालयाच्या निर्णयात मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाने कोकाटे यांच्यासह अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावून प्रकरणाची सुनावणी २१ एप्रिल या दिवशी ठेवली.

श्रावस्ती (उत्तरप्रदेश) येथे विद्यार्थिनींचा विनयभंग करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक

अशांना सरकारने जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा  मिळण्यास प्रयत्न केल्यास असे कृत्य करण्याचे धाडस कुणीही करणार नाही !