सिंधुदुर्ग : रेडी येथे फलकावरील महिलांच्या छायाचित्रावर अश्‍लील लिखाण करून विटंबना करणार्‍या ५ जणांना अटक !

धर्मशिक्षणाअभावी समाजाचे होत असलेले नैतिक अधःपतन ! महिलांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे ! – गोविंद चोडणकर, गोवा

लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.

गोवा : पर्वरी येथील सचिवालयाच्या बाजूला उभारलेल्या मंत्र्यांच्या कार्यालयाचे मंत्रालय असे नामकरण करून आज उद्घाटन

मिनिस्टर ब्लॉकच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून ३० मे या दिवशी गोवा घटक राज्यदिनाच्या निमित्ताने या ‘मंत्रालया’चे उद्घाटन होत आहे !

हिंदुत्‍वाच्‍या रक्षणासाठी तुम्‍हा सर्वांना दायित्‍व घ्‍यावे लागेल ! – मंगलप्रभात लोढा

१०० वर्षांपूर्वी समाजातील दलित बंधूंना मान कसा मिळावा ? याकरता भागोजीशेठ कीर यांनी पतित पावन मंदिर उभारले. याच मंदिरात वीर सावरकर यांनी सहभोजन चालू केले. वीर सावरकर यांनी ‘स्‍वातंत्र्य मिळण्‍यापूर्वी भारतमातेला परकीय शक्‍तींपासून मुक्‍त करीन’, अशी शपथ घेतली; कारण त्‍याविना भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणार नाही, हे त्‍यांना ठाऊक होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’ने निदर्शनास आणून दिलेली बसस्‍थानकांची दुरवस्‍था रोखणार !

महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षाच्‍या निमित्ताने राज्‍य सरकारने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्‍वच्‍छ-सुंदर बसस्‍थानक अभियान’ घोषित केले; मात्र प्रत्‍यक्षात हे अभियान राबवण्‍यासाठी एस्.टी. महामंडळाकडे पैसे नाहीत.

छत्रपती शिवरायांचे कार्य ऊर्जादायी ! – गणेश नाईक, आमदार

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला ऊर्जा देणारे आहे. जगाच्‍या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यासारखा सुजाण राजा होणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्‍टाचारमुक्‍त व्‍यवस्‍था उभी केली ! – देवेंद्र फडणवीस

युपीएच्‍या (संयुक्‍त पुरोगामी आघाडी) सरकारच्‍या कार्यकाळात जेवढे ऐतिहासिक घोटाळे झाले, तेवढे स्‍वतंत्र भारताच्‍या इतिहासात कधीही झाले नव्‍हते. अशा प्रकारची अवस्‍था देशात पाहिली. नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्‍यानंतर मागच्‍या नऊ वर्षांमध्‍ये अतिशय गतीमान निर्णयप्रक्रिया पाहिली. प्रचंड विकास आपण पाहिला.

धर्मांधाला साहाय्‍य करणार्‍यांवरही ‘पॉक्‍सो’अंतर्गत गुन्‍हा नोंद करावा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

भांडुप येथील अल्‍पवयीन मुलीला तिच्‍याच परिसरातील एका धर्मांध तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणात त्‍याला साहाय्‍य करणार्‍यांवरही ‘पॉक्‍सो’अंतर्गत गुन्‍हा नोंद करावा, या मागणीसाठी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रात्री शिष्‍टमंडळासह पोलीस आयुक्‍तांची भेट घेतली.

सातारा येथील ‘हिंदु एकता दिंडी’त हिंदु राष्‍ट्राचा जयघोष !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियानाच्‍या अंतर्गत सातारा येथे २८ मे या दिवशी ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते. या दिंडीत शहरातील समस्‍त हिंदु बांधवांनी शेकडोंच्‍या संख्‍येने सहभागी होत हिंदु राष्‍ट्राचा जयघोष केला.

पुणे येथे भव्‍य हिंदु एकता दिंडीत १२ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींकडून हिंदु राष्‍ट्राचा जागर !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी हिंदु राष्‍ट्र जागृती अभियान राबवले जात आहे. त्‍या अंतर्गत २८ मे या दिवशी हिंदु राष्‍ट्राचा जागर करण्‍यासाठी येथे भव्‍य हिंदु एकता दिंडीचे आयोजन केले होते.