आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्यासाठी मूर्ती अभ्यास आणि संशोधन आवश्यक ! – डॉ. जी.बी. देगलूरकर, मूर्तीशास्त्राचे जाणकार

मूर्तीशास्त्र हा दुर्लक्षित विषय असून विद्यापिठाने या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मूर्तीचा खोलवर जाऊन अभ्यास केला, तरच आपला जाज्वल्य इतिहास समोर येणार आहे.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत दौरा !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत दौरा पार पडला. यानिमित्ताने विविध वृत्तपत्रांचे कार्यालय आणि न्यूज चॅनल यांनी त्यांची मुलाखत घेतली.

मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती गंभीर !

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही वेगाने अल्प होत असून पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला गळती !

पाण्याची इतकी टंचाई असतांना या गळतीकडे प्रशासन त्वरित लक्ष का देत नाही ? यासाठी उत्तरदायी कर्मचार्‍यांवर योग्य कारवाई होणे आवश्यक.

कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने कलियुगात कल्याण होईल ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

ज्या कुळात आपला जन्म झाला आहे, त्या कुलदेवतेचे नामस्मरण करा. ती आपल्या प्रारब्धाशी संबंधित देवता आहे. आपली साधना वाढल्यावर आपल्याला जीवनात सद्गुरु भेटतील. नामस्मरण केल्यास जीवनाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण द्यावे ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो; मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की, सर्व तुटून पडतात. गोरगरीब मराठ्यांची मुलेही मोठी झाली पाहिजेत, यासाठी मी लढत आहे.

शाळेचे शुल्क न भरल्याने शाळेच्या तक्रारीवरून ४ विद्यार्थ्यांना पालकांसह पोलीस ठाण्यात नेले !

या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने ‘शुल्क भरण्यास नकार दिला म्हणून असा कोणताही प्रकार आम्ही केला नाही, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवलेले नाही’, असा खुलासा केला आहे.

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांचे सनातन संस्थेला आशीर्वाद !

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे सोलापूर दौर्‍यावर होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक श्री. हिरालाल तिवारी यांनी शंकराचार्य यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

काशीविश्वनाथप्रमाणे पंढरपूर येथील विकास आराखडा होणार ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

पंढरपूरच्या विकासासाठी काशीविश्वनाथप्रमाणे मोठा विकास आराखडा बनवण्याचे काम चालू आहे. संवादातून बाधित नागरिक आणि दुकानदार यांचे प्रश्न सोडवले जातील. कोणतीही विकासकामे करतांना गावात नाराजी असता कामा नये.

धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ ‘अक्कलकोट बंद’ला १०० टक्के प्रतिसाद !

अक्कलकोट बंद करण्याची वेळ येईपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही ?