दारूबंदी असून बिहारमधील पुरुष दारू पिण्यात देशात पुढे !

दारूबंदी असतांनाही तेथील पुरुषांना दारू मिळतेच कशी ? अशा प्रकारे दारू पिण्यात बिहार पुढे असणे, हे तेथील शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांना लज्जास्पदच होय !

नंदुरबार येथे ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’च्या वतीने आमरण उपोषणास प्रारंभ !

मृत्यूमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या नंदुरबार नगरपरिषदेच्या ठेकेदाराचा ठेका रहित करण्याबरोबर अन्य मागण्याही उपोषणार्थींच्याकडून करण्यात आल्या आहेत.

एअर इंडियाच्या विमानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के दरात तिकीट उपलब्ध होणार !

देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडिया आस्थापनाच्या विमानाचे तिकीट निम्म्या दरात मिळणार आहे. एअर इंडियाच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आलेली आहे; मात्र यासाठी काही अटी असणार आहेत.

गुजरातमधील २१४ पैकी ६२ रुग्णालयांकडे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ नाही ! – सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले

रुग्णालयांच्या सुरक्षेविषयीची इतका हलगर्जीपणा होतो आणि  त्याकडे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन दुर्लक्ष करतात, हे केवळ भारतातच घडू शकते ! न्यायालयाने या संदर्भातील दोषींना कारागृहात डांबण्याचीच शिक्षा केली पाहिजे, असे जनतेला वाटते !

पाकिस्तानात बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याचा कायदा लागू !

• विशेष न्यायालये स्थापन करून ४ मासांतच निकाल लावणार • योग्य प्रकारे अन्वेषण न करणारे पोलीस आणि सरकारी अधिकारी यांना दंड होणार : पाकिस्तान असा कायदा बनवू शकतो, तर त्याच्यापेक्षा अधिक पुढारलेला असलेला भारत का बनवू शकत नाही ?

‘कर्मचार्‍यांवर आक्रमण होण्याच्या भीतीमुळे फेसबूकची मवाळ भूमिका !’ – अमेरिकेतील दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा थयथयाट !

हिंदूंच्या संघटनांना ‘हिंसक’ ठरवण्याच्या केलेल्या या प्रयत्नांवरून भारत सरकारने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’वर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! भारतात अशा दैनिकांच्या विक्रीवर आणि संकेस्थळावर बंदी घातली पाहिजे !

आता शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्प उभारा !

भाजपवर लोकांनी विश्‍वास दाखवला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जर शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्प उभारायचा आहे, तर त्यांनी त्यासंबंधीची प्रक्रिया त्वरित चालू करावी, असे माझे आवाहन आहे.

सांगवे-कनेडी बाजारपेठेतील अवैध व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांची कणकवली पोलीस ठाण्यावर धडक

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून अवैध व्यवसाय का बंद करत नाही ?

भूमीगत वीजवाहिनीच्या जागी असलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर’पासून २ मीटर परिघात कचरा टाकणे टाळावे ! – वीज खात्याची सूचना

जनतेला शिस्त नाही आणि त्यामुळे अशी सूचना करावी लागते, हे दुर्दैवी आहेच; पण  संबंधित पालिका किंवा पंचायत प्रशासनानेही कचरा विल्हेवाटीची योग्य व्यवस्था केली, तर असे प्रसंग उद्भवणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कुठे अल्प पडते ते पहावे !

(म्हणे) ‘तक्षशिला विश्‍वविद्यालय प्राचीन पाकिस्तानचा भाग !’

खोटेपणाचा कहर ! जर तक्षशिला ‘प्राचीन पाकिस्तान’ असेल, तर पाकने हे मान्य करावे की, त्यांचे पूर्वज हिंदु होते आणि ते बाटलेले मुसलमान आहेत ! त्यांचा इतिहास इतका महान आहे, तर त्यांनी महान हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश करावा !