आपण तेजाचे उपासक आहोत कि केवळ एखाद्या दरीत रहाणारे आहोत ?
देशाचे नाव ‘इंडिया’ (India) कि ‘भारत’ (Bharat) यांपैकी काय हवे ? यावरून चालू झालेली चर्चा आणि चिघळत असणार्या वादाच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. मुळात या देशाचे नाव ‘आर्यावर्त’ असे होते. पुढच्या काळात सीमांचा संकोच, परकियांची आक्रमणे होत गेली, तसतशी नावेही पालटत गेली.