|

मैसुरू (कर्नाटक) : ज्यांना दसरा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख नाही, त्यांनीच बानू मुश्ताक यांना विरोध केला. इतिहास विकृत करून स्वार्थासाठी राजकारण करणे अक्षम्य गुन्हा आहे. राजकारण करायचेच असेल, तर निवडणुकीत करूया. सणासुदीच्या निमित्ताने खालच्या पातळीचे राजकारण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे, असे वक्तव्य येथील दसरा महोत्सवाचे हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या भाषणात केले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले की,
१. राज्यातील बहुसंख्य समाजाने बानू मुश्ताक यांनी दसर्याचे उद्घाटन केल्याचे स्वागत केले, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. (बहुसंख्यकच नव्हे, तर मुसलमानांनीही याचा उघड विरोध करून त्याला हराम (इस्लामनुसार अयोग्य) असल्याचे म्हटले असतांना ती वस्तूस्थिती नाकारून सिद्धरामय्या कुणाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत ? – संपादक)
२. बानू मुश्ताक या एक मुसलमान महिला असण्यापेक्षा त्या माणूस म्हणून माणुसकीची मूल्ये पाळणार्या व्यक्ती आहेत.
३. राज्यघटनेतील सहिष्णुतेची मूल्ये पाळणारेच खरे भारतीय आहेत. (भारतात सहिष्णु कोण आहेत हे सर्वज्ञात आहे ! – संपादक )आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे.
संपादकीय भूमिका
|
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !