Karnataka CM Siddaramaiah : (म्हणे) ‘सणासुदीच्या निमित्ताने घाणेरडे राजकारण नको;  राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे !’

  • मैसुरू (कर्नाटक) दसरोत्सवाचे हिंदुद्वेषी लेखिका बानु मुश्ताक यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे वक्तव्य

  • स्वार्थासाठी इतिहास विकृत केल्याचाही दावा

दसरा महोत्सवात हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक यांना सन्मानित करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या

मैसुरू (कर्नाटक) : ज्यांना दसरा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख नाही, त्यांनीच बानू मुश्ताक यांना विरोध केला. इतिहास विकृत करून स्वार्थासाठी राजकारण करणे अक्षम्य गुन्हा आहे. राजकारण करायचेच असेल, तर निवडणुकीत करूया. सणासुदीच्या निमित्ताने खालच्या पातळीचे राजकारण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे, असे वक्तव्य येथील दसरा महोत्सवाचे हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या भाषणात केले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले की,

१. राज्यातील बहुसंख्य समाजाने बानू मुश्ताक यांनी दसर्‍याचे उद्घाटन केल्याचे स्वागत केले, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. (बहुसंख्यकच नव्हे, तर मुसलमानांनीही याचा उघड विरोध करून त्याला हराम (इस्लामनुसार अयोग्य) असल्याचे म्हटले असतांना ती वस्तूस्थिती नाकारून सिद्धरामय्या कुणाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत ? – संपादक)

२. बानू मुश्ताक या एक मुसलमान महिला असण्यापेक्षा त्या माणूस म्हणून माणुसकीची मूल्ये पाळणार्‍या व्यक्ती आहेत.

३. राज्यघटनेतील सहिष्णुतेची मूल्ये पाळणारेच खरे भारतीय आहेत. (भारतात सहिष्णु कोण आहेत हे सर्वज्ञात आहे ! – संपादक )आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे.

संपादकीय भूमिका

  • इतिहास कुणी विकृत केला ? सहस्रो हिंदूंचा नरसंहार केल्याचे अनेक दाखले असतांनाही टिपूचे उद्दात्तीकरण कोण करत आहे ? अनेक वेळा इतिहास पाटलून काँग्रेसने भारतात हिंदूंवरील अत्याचार, तसेच हिंदूंचा पराक्रमी इतिहास लपवून ठेवला !
  • जर राज्यघटना धर्मनिरपेक्ष असेल, तर तुम्ही जातीजनगणना का करत आहात ? स्वार्थासाठी अहिंदूंना हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी करून घेण्याचा हा कट आहे, हे सगळ्यांना समजले आहे !