पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू ! – महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

या आगीच्या प्रकरणी घातपाताचा संशयाच्या दृष्टीने केंद्रीय यंत्रणांकडून तपास चालू करण्यात आला असून माहिती घेण्यात येत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.

आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी दोघा चिनी नागरिकांना अटक !

भारतातील चिनी नागरिकांवर सुरक्षायंत्रणांनी किती मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते ! त्यामुळे चिनी नागरिकांना भारतात प्रवेश द्यायचा का, याचा सरकारने विचार करावा !

शेतकरी आंदोलनातील नेते बलदेव सिंह सिरसा यांची एन्.आय.ए.कडून चौकशी होणार

एन्.आय.ए.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना आणि त्यांच्याकडून सामाजिक संघटनांना होणारा अर्थपुरवठा यांची सूची बनवली आहे. या सामाजिक संघटना विदेशातून मिळालेला पैसा देशविरोधी कारवायांसाठी व्यय (खर्च) करत असल्याची माहिती मिळाली आहे.  

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदाराला अटक

सहस्रो रुपयांचे आर्थिक घोटाळे करणार्‍यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशीची शक्यता

राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्यात वर्ष २००८ ते २०११ या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.

एटा (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानी महिलेची सरपंचपदी निवड झाल्याच्या वर्षभरानंतर प्रशासनाला जाग !

भारतीय प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी लज्जास्पद घटना ! जगात कुठल्याही देशात अशा घटना घडत नाहीत, ज्या भारतात घडतात, हे संतापजनक ! याला उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

समाजवादी पक्षाचे माजी खाणमंत्री गायत्री प्रजापती यांचे घर आणि कार्यालये यांवर ईडीच्या धाडी

एवढी अवैध संपत्ती जमा करेपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ? कि त्यांना त्या वेळी कारवाई न करण्यासाठी लाच देण्यात आली होती ? देशातील अन्य भ्रष्ट आजी-माजी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे किती अवैध संपत्ती असेल, कोण जाणे !

कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी अनोळखी लोकांनी माहिती मागितल्यास देऊ नये !

नागरिकांनी असे भ्रमणभाष संपर्क, लिंक किंवा लघुसंदेश यांना प्रतिसाद देऊ नये. ठाणे सिटी पोलिसांनी ट्वीट करून ही सूचना दिली आहे.

सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याठी मुदतवाढ ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस दिल्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत; मात्र मी शिवसेनेमध्ये आहे, शिवसेनेतच राहीन आणि शिवसेनेतच मरीन.