इराण-पाकिस्तान येथील आतंकवाद्यांकडून पश्चिम भारतीय समुद्रतटांचा तस्करीसाठी वापर !
भारताची पश्चिम किनारपट्टी आणि सागरी क्षेत्र यांचा वापर पाकिस्तान अन् इराण येथील आतंकवादी गट शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी करण्यासाठी करत आहेत. यासाठी वापरलेली पद्धत पूर्णपणे चित्रपटांमध्ये दाखवतो, तशी आहे, जेणेकरून ते पकडले गेले, तरी त्यांचा नेता ओळखला जाणार नाही.