कोंढवा (पुणे) येथे केलेल्‍या कारवाईत ६ गोवंशियांची सुटका !

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्‍यानेच सर्वत्र गोहत्‍या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !

उदयनिधी स्‍टॅलिन यांच्‍या विरोधात प्रभाकर भोसले यांची पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार !

हिंदु धर्म संपवण्‍याविषयीचे उदयनिधी यांचे वक्‍तव्‍य चिथावणीखोर असून राज्‍यघटनेने दिलेल्‍या अधिकाराची गळचेपी करणारे आहे. हा अजामीनपात्र गुन्‍हा असून उदयनिधी यांच्‍यावर कायदेशीर कारवाईची मागणी भोसले यांनी तक्रारीमध्‍ये केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची सरकारला ३० दिवसांची मुदत !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्‍या आवाहनानंतर मागील १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे; मात्र आहे त्‍या ठिकाणी बसून आंदोलन कायम ठेवण्‍याची भूमिका मनोज जरांने यांनी घेतली आहे.

मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री फडणवीस हे बेईमानी करणार नाहीत, जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवावे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी पुढे म्‍हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते १०० टक्‍के मिळणार आहे. मी आणि माझे सर्व सहकारी या आंदोलनासमवेत आहोत. श्री शिवप्रतिष्‍ठान तुमच्‍या पाठीशी आहे.’’

पुण्‍यातील बुधवार पेठेतून अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या ७ बांगलादेशी नागरिकांना अटक !

बांगलादेशी घुसखोरांची संख्‍या किती प्रमाणात वाढली असेल, हे या घटनेतून लक्षात येते. भारतात घुसलेल्‍या लाखो बांगलादेशींपैकी केवळ काहींनाच अटक होते. ही समस्‍या मुळापासून दुरुस्‍त करण्‍यासाठी सरकार उपाययोजना करणार का ?

(म्‍हणे) ‘निवडणुकीसाठी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ आणि भाजप यांच्‍याकडून नरसंहाराची शक्‍यता !’ – प्रकाश आंबेडकर, अध्‍यक्ष, वंचित बहुजन आघाडी

देशात दंगली घडवणार्‍यांविषयी, तसेच आतंकवादी कारवाया करणार्‍यांविषयी चकार शब्‍दही न काढता हिंदूंनाच हिंसक ठरवणे, हा हिंदुद्वेष !

नंदुरबारमधील कुपोषण आणि बालमृत्‍यू यांना राज्‍य सरकार उत्तरदायी ! – आमदार आमश्‍या पाडवी

स्‍वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्‍या सर्व शासनकर्त्‍यांना हा प्रश्‍न सोडवता न येणे लज्‍जास्‍पद आहे. सरकारने आता तरी ही समस्‍या संपवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

पुसेसावळी (जिल्‍हा सातारा) येथे संचारबंदी !

सामाजिक माध्‍यमांद्वारे कुणी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केले ? हे उघड असतांना त्‍याकडील लक्ष दुसरीकडे वळवण्‍यासाठी धर्मांध अकारण हिंदु जनआक्रोश मोर्चा आणि त्‍यात सहभागी हिंदु नेते यांवर आरोप करत आहेत ! धर्मांधांचा हा कावेबाजपणा लक्षात घ्‍या !

ज्‍योतिषाला विचारून करण्‍यात आली होती भारतीय फुटबॉल संघाची निवड !

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्‍टिमॅक यांनी गेल्‍या वर्षी अनेक सामन्‍यांमध्‍ये संघातील खेळाडूंची निवड करण्‍यासाठी ज्‍योतिषी भूपेश शर्मा यांचे साहाय्‍य घेतल्‍याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्यामागील कारण !

हिंदूंना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला कधीच शिकवले जात नाही. त्यातच बुद्धीप्रामाण्यवादी धर्माविरुद्धचे विचार हिंदूंवर बिंबवतात. यांमुळे हिंदूंची स्थिती जगातच नाही, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले