मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांविषयीचे मनसेचे आजचे आंदोलन स्थगित

‘श्री गणेशचतुर्थीपूर्वी मनसेच्या सर्व सूचनांवर कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्याने प्रशासनाच्या विनंतीनुसार ११ सप्टेंबर या दिवशीचे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

मुंबईत जात प्रमाणपत्र विलंबाने देणार्‍या शासकीय अधिकार्‍याला ३ लाख रुपयांचा दंड !

जातीचे प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थिनीला विद्यापिठात प्रवेश घेता आला नाही. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांना उत्तरदायी ठरवून त्यांच्या वेतनातून ३ लाख रुपये दंड पीडित विद्यार्थिनीला देण्याची शिक्षा दिली.

गोवा : दशकभरात चिकणमातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्‍यांची संख्या घटली !

गोवा हस्तकला महामंडळ अनुदान देण्याची योजना राबवत आहे आणि गेली १५ वर्षे अनुदानाच्या रकमेत वाढ केलेली नाही. कच्चा मालाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रतिमूर्ती अनुदान वाढवून ते २५० रुपये प्रतिमूर्ती करण्याची मागणी श्री गणेशमूर्तीकार करत आहेत.

नैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास आठकाडी आणू नये !

गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन कोल्हापूर येथे पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेट्स’ लावून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी करते, तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विसर्जनास बंदी केली जाते.

किर्लोस्करवाडी (जिल्हा सांगली) येथील रेल्वेस्थानकात सुविधा द्या ! – किर्लाेस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटना 

सांगली जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांसाठी, तसेच पलूस, तासगाव, कडेपूर, खानापूर आणि वाळवा या तालुक्यांतील गावांसाठी किर्लोस्करवाडी हे नजीकचे अन् सोयीचे रेल्वेस्थानक आहे. सद्यःस्थितीत या स्थानकावर केवळ २ ‘पॅसेंजर’ आणि ३ जलद (एक्सप्रेस) गाड्यांना थांबा आहे. अ

गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळण्याची पोलीस आयुक्तांची गणेशोत्सव मंडळांना सूचना !

गणेशोत्सव मंडळांनी ध्वनीवर्धक यंत्रणा लावतांना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर यांचा विचार करावा. आवाजाने कुणालाही त्रास होऊ नये, याची दक्षता घ्यावी.

गोवा : पोलीस अधिकार्‍यांच्या छळवणुकीला कंटाळून महिला पोलीस उपनिरीक्षकाची स्वेच्छानिवृत्ती

गोवा पोलीस दलातील अधिकार्‍यांची गैरवर्तणूक चालूच ! पोलीस प्रशिक्षणात साधनेद्वारे नैतिकता शिकवणे अत्यावश्यक !

आज ‘हिंदु धर्म संघटने’च्या वतीने ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रम ! 

कोल्हापुरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशन’च्या वतीने श्रावण मासाच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच ११ सप्टेंबरला ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील ४६ माध्यमिक शाळा अनुदानास अपात्र !

राज्यातील विनाअनुदानित माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासाठी गेल्या वर्षीच्या सुधारित निकषांनुसार प्रस्ताव मागवण्यात आले होते. या शाळांच्या प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील ४६ शाळा अनुदानास अपात्र ठरल्या आहेत.

वाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंद

भिवंडी येथील वाडा महामार्गावर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरून जातांना तोल जाऊन पडल्याने आकाश जाधव (वय २२ वर्षे) या तरुणाचा ३१ ॲागस्टला अपघात होऊन मृत्यू झाला होता.