
मुंबई – भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा जातीद्वेष आणि त्यातून हत्या घडवून आणण्याचा इतिहास आहे. निवडणूक जिंकण्याचे हे त्यांचे पारंपरिक धोरण दिसते. आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतांना गुजरात दंगलीप्रमाणे भारतातील लोकशाही, मुसलमान, दलित आणि आदिवासी बहुजन यांचा नरसंहार करण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही, अशी शक्यता वाटते, असे ट्वीट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद़्घाटनासाठी जाणार्या भाविकांना ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान करावी, तसेच श्रीराम मंदिराच्या सुरक्षेचे दायित्व राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांकडे सोपवावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.
भाजपा-आरएसएस देशात दंगली घडवू शकतात – प्रकाश आंबेडकर @Prksh_Ambedkar #BJP @azadmarathi https://t.co/gbdnO3NSVa
— Azad Marathi (@AzadMarathi) September 12, 2023
संपादकीय भूमिका :देशात दंगली घडवणार्यांविषयी, तसेच आतंकवादी कारवाया करणार्यांविषयी चकार शब्दही न काढता हिंदूंनाच हिंसक ठरवणे, हा हिंदुद्वेष ! |
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’