धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करा ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘प्रत्येक चिन्हातून सूक्ष्म सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. बहुतांश धार्मिक नेते त्यांच्या धार्मिक चिन्हांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांकडे लक्ष देत नाहीत आणि याचा प्रतिकूल परिणाम त्यांचे अनुयायी अन् भक्त यांवर होऊ शकतो.

तमिळनाडूमध्ये काही श्री गणेशमूर्ती शाळांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोकले टाळे !

सनातन धर्माला संपवण्याचे ध्येय बाळगणार्‍या तमिळनाडूतील द्रमुक सरकारकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली जाणीवपूर्वक अशी कारवाई होत असेल, तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही !

औरंगाबाद जिल्हा झाला ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशिव’ !

औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव, तसेच उस्मानाबाद जिल्हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांचे नाव पालटण्यात आले नव्हते. ते आता राजपत्र प्रकाशित करून पालटण्यात आले आहे.

विश्‍वस्तपदाचा आनुवंशिक अधिकार असलेल्या कुटुंबातील सदस्याची ‘कर्मचारी’ म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते ! – उच्च न्यायालय

वंशपरंपरागत विश्‍वस्त किंवा विश्‍वस्तपदाचा आनुवंशिक अधिकार असलेल्या कुटुंबातील सदस्याला मंदिरात कर्मचारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते; मात्र त्यांना नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी विश्‍वस्तपदावरील दावा सोडावा लागेल, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

ब्रिटनचे बर्मिंघम शहर दिवाळखोर होण्यामागे पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक !

संपूर्ण पाकिस्तानच आता आर्थिक दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यातूनच पाकिस्तान्यांची पात्रता काय आहे ?, हे जगाला लक्षात आले असेलच !

जे सनातन धर्माला शिव्या देत आहेत, त्यांचा वर्ष २०२४ मध्ये अंत होणार ! – योगऋषी रामदेवबाबा

जे सनातनला शिव्या देत आहेत, त्या सर्वांचा वर्ष २०२४ मध्ये (वर्ष २०२४ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत) अंत होणार आहे, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

बारामुला (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार

अनंतनागमदील कोकेरनाग येथे चौथ्या दिवशीही चकमक चालू आहे. येथे एका आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे, तर दुसर्‍याचा शोध घेण्यात येत आहे. याच वेळी काश्मीरच्या बारामुला येथे सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले.

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात !

अयोध्या येथील श्रीरामजन्मूभीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिराची काही छायाचित्रे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी प्रसारित केली आहेत.

कॅनडाने भारतासमवेतच्या मुक्त व्यापारावरील चर्चा पुढे ढकलली !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भारतद्वेषी आणि खलिस्तानप्रेमी मानसिकता जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत कॅनडाकडून कोणतीही अपेक्षा करणे व्यर्थच म्हणावे लागेल !

कोळीकोड (केरळ) येथे निपाह विषाणुच्या संसर्गाच्या धोक्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था बंद

कोळीकोड निपाह विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने २४ सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. येथे निपाह विषाणुचे ६ रुग्ण आढळले आहेत, तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या १ सहस्र ८ इतकी झाली आहे.