ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा !

इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणासाठी २५ मे या दिवशी भाजपने मंत्रालयावर मोर्चा काढला. नरीमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या येथून मोर्च्याला प्रारंभ झाला. काही अंतरावर पोलिसांनी मोर्चा अडवल्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठिय्या आंदोलन केले.

विद्यापिठात होणारे दीक्षांत सोहळे मराठमोळ्या पद्धतीने होणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री

इंग्रज गेले, आता आपण आपली प्रथा चालू करू. विद्यापिठात होणारे दीक्षांत सोहळे उत्साहाने भरलेले असायला हवेत. तरुणांच्या कलाने कार्यक्रम व्हायला हवा. तुमचा वेतन आयोग माझ्या दृष्टीने गौण आहे. विद्यार्थी महत्त्वाचा आहे. त्यांना काय हवे, याचा विचार होणार कि नाही

श्री क्षेत्र जेजुरीगड आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांना संमती !

श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामास संमती देण्यात आली, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करतांना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

‘उगवत्या सूर्या’तील भारत !

योग्य संधी साधून पंतप्रधान मोदी यांनीही सुगा यांचे याविषयी कौतुक करून त्यांना अन् त्यांच्या खासदारांना यंदाचा गणेशोत्सव पहाण्यासाठी भारतात आमंत्रित केले. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे भारतात वहात असून भारताबाहेरही अशा प्रकारे त्याचे पडसाद उमटत आहेत, हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी !

शत्रूचे प्रवक्ते !

भारताच्या मुळावर जे जे देश उठले आहेत, त्या त्या देशांच्या प्रवक्त्यांची एकप्रकारे भूमिका काँग्रेसी नेटाने पार पाडतांना दिसतात. अशा काँग्रेसने सत्तेत असतांना चीन आणि पाक यांच्या संदर्भात कसे निर्णय घेतले असतील, हे यावरून लक्षात येते. अशा पक्षाचे अस्तित्व देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्याचे राजकीयदृष्ट्या अस्तित्व संपवणे, यातच खरे राष्ट्रहित आहे !

नाशिक येथे भ्रष्ट वाहकाला कारागृहाची शिक्षा, तर फुकट प्रवास करणार्‍यांची माहिती सामाजिक माध्यमांत उघड करणार !

तोट्यास उत्तरदायी असणारे बसचालक, वाहक, ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई करून त्यांच्याकडून सर्व हानीभरपाई वसूल केली पाहिजे !

एर्नाकुलम् (केरळ) येथे आयोजित केलेल्या साधनाविषयक प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘हिंदूंनी आता ‘मी आणि माझा परिवार’ यामधून बाहेर येऊन व्यापक व्हावे अन् स्वतःमध्ये कौटुंबिक भावना निर्माण करावी’. या कार्यक्रमात अनेक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी जिज्ञासूंनी विषय पुष्कळ आवडल्याचे सांगितले.

नागरिकांनी प्लास्टिक कचरा गटारात टाकू नये !

महापालिकेच्या वतीने पावसाळापूर्व नालेसफाईची मोहीम चालू आहे. प्रत्येक चेंबरमधून प्लास्टिक कचरा निघत असल्यामुळे नागरिकांनी तो गटारामध्ये न टाकता महापालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

१ जूनपासून ६ प्रकारे कचरा वर्गीकरण न केल्यास सोलापूर येथे दंडात्मक कारवाई होणार !

घरगुती कचर्‍याचे विविध ६ प्रकारचे वर्गीकरण न केल्यास १ जूनपासून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.