अमली पदार्थांविरोधात उपाययोजना करण्यासह मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६ मोठे निर्णय !

‘मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना’ ही केंद्रपुरस्कृत योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आली. मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक ही योजना २०२३ पर्यंत राबवण्यात येणार आहे.

शैक्षणिक जिहाद !

ही घुसखोरी करण्यामागील कारस्थान हिंदू जाणून आहेत, हे साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी असणार्‍यांनी लक्षात घ्यावे. प्राध्यापक राकेशकुमार पांडेय यांनी जिहादचे वास्तव समोर आणल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल !

पुणे येथे आचार्य विनोबा भावे शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये रहात असलेल्या झोपडपट्टीधारक कुटुंबियांना हलवण्याची शाळा समितीची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? झोपडपट्टीतील नागरिकांची सोय शाळा चालू होण्यापूर्वी सरकारने का केली नाही ?

काश्मीरमधील हिंदूंच्या हत्यांच्या विरोधात पुसद आणि यवतमाळ येथे निदर्शने

काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून आतंकवादी करत असलेल्या त्यांच्या हत्यांच्या विरोधात पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर यवतमाळ येथील श्री दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.

शाळेची घंटा वाजली; पण…!

कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेल्या शाळा (मधला काही कालावधी सोडला तर) १८ मासांनी पुन्हा ४ ऑक्टोबरपासून पूर्ववत् चालू झाल्या. बहुसंख्य ठिकाणी ‘शाळा चालू होणार’ याचा आनंद विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि शाळेशी संबंधित व्यावसायिक यांच्या तोंडवळ्यावर ओसंडून वहात होता.

फेसबूकचा हिंदुद्वेष जाणा !

फेसबूकने धोकादायक संघटना आणि व्यक्ती यांची ४ सहस्रांहून अधिक जणांची गोपनीय सूची बनवली असून यात ‘सनातन संस्थे’चे नाव आहे. या सूचीत पसार आतंकवादी झाकीर नाईक, विविध आतंकवादी कारवायांमध्ये हात असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांचा समावेश नाही.

फेसबुक ने उसकी सूची में सनातन संस्था को ‘धोखादायक’ बताया ! पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, जाकीर नाइक का नाम नहीं !

हिन्दूद्वेषी फेसबुक का विरोध करें !

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १६.१०.२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

संरक्षणाच्या दृष्टीकोनातून रस्त्यांचे महत्त्व !

‘गेल्या २० वर्षांपासून भारत काश्मीर खोर्‍यामध्ये रेल्वे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु यासाठी त्याला काही वर्षे लागणार आहेत. त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे रस्ते हे सर्वांत चांगले माध्यम आहे. काश्मीरमध्ये जोझिला बोगदा बांधण्यात येत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.

रवि ग्रहाचा तूळ राशीत होणारा प्रवेश, त्याचे होणारे परिणाम आणि त्या काळात करावयाची सूर्याेपासना !

तूळ राशीत रवि ग्रह अशुभ मानला असल्याने प्रथम ५ दिवस प्रतिकूल असतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती आणि प्राणशक्ती न्यून होते. यासाठी रवि ग्रह तूळ राशीत प्रवेश करण्याच्या पुण्यकालात सूर्यदेवतेचा ‘ॐ सूर्याय नमः।’ हा जप करावा.