जुन्नर (पुणे) येथील देशी कुक्कुटपालन फार्ममधील २०० कोंबड्या अज्ञात आजाराने मृत

सध्या राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची स्थिती असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग निदान प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

९०० कोटी रुपयांचा सायबर गुन्हे सुरक्षा प्रकल्प लवकर चालू करणार – गृहमंत्री

राज्यात ९०० कोटी रुपयांचा सायबर गुन्हे सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकर चालू करून या माध्यमातून सायबर गुन्हे थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

स्वयंपूर्ण आणि भांगराळे (सोनेरी) गोवा यांसाठी सरकार कटीबद्ध ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

विकास आणि जागतिकीकरण यांच्या दृष्टीने गोवा संपूर्ण देशासमवेत हातात हात घालून पुढे जात आहे आणि तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले.

नोएडा (उत्तरप्रदेश) हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने तरुणीच्या भावाकडून तरुणाची हत्या

हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत त्यांच्याशी विवाह करणार्‍यांच्या विरोधात पोलीसही काही करत नाहीत. हिंदु तरुणाने प्रेम करून मुसलमान तरुणीशी विवाह केला, तर त्याला ठार केले जाते, हे लक्षात घ्या !

गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक विनायक खेडेकर यांना पद्मश्री पुरस्कार

गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक आणि साहित्यिक श्री. विनायक विष्णु खेडेकर यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

८ वर्षे जुनी गाडी असलेल्यांना आता ‘हरित कर’ भरावा लागणार !

८ वर्षे जुन्या वाहनांवर लवकरच हरित कर (‘ग्रीन टॅक्स’) आकारला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘ग्रीन टॅक्स’ आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा ! – हिंदु जनजागृती समिती

तिरंगा मास्क किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज हे देशप्रमाचे प्रदर्शन करण्याचे माध्यम नाही. उलट ध्वजसंहितेनुसार अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा वापर करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे आणि हे राष्ट्रगौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ चे उल्लंघन आहे.

ममता बॅनर्जी भ्रष्ट आणि सैतान व्यक्ती असल्याने त्यांचा रामावर राग असणे स्वाभाविक ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी भाषण करण्यास उभ्या राहिल्यावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त करत भाषण करण्यास नकार दिला होता. त्यावरील सिंह यांची ही प्रतिक्रिया आहे.

पूर्वजांंनी राखलेल्या भूमी आमच्याच, सरकारच्या नाहीत ! – सत्तरीतील लोकांचा दावा

विश्‍वजित राणे यांनी सत्तरीतील लोकांची दिशाभूल केली. त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी व्यासपिठावर येऊन आमच्याशी चर्चा करावी, असे आव्हान या वेळी सत्तरी तालुक्यातील नागरिक आणि अधिवक्ता शिवाजी देसाई यांनी विश्‍वजित राणे यांना दिले.

५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाहीत ! – रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी ‘५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात येणार आहेत’, असे वृत्त प्रसारमाध्यमांकडून देण्यात आले होते; मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, जुन्या नोटा वैध असून त्या चलनात कायम रहातील.